AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भ्रष्टाचारात कोणते शहर ठरले अव्वल, पुणे-मुंबई कोणत्या क्रमांकावर

national crime records bureau : नॅशनल क्राइम ब्युरो २०२२चा अहवाल आला आहे. या अहवालानुसार भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात टॉपमध्ये आहे. तसेच दंगलीचे प्रकरणेही महाराष्ट्रात सर्वाधिक घडली आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील परिस्थिती चिंता निर्माण होणारी आहे.

भ्रष्टाचारात कोणते शहर ठरले अव्वल, पुणे-मुंबई कोणत्या क्रमांकावर
ACB
| Updated on: Dec 09, 2023 | 12:13 PM
Share

योगेश बोरेस, पुणे | 9 डिसेंबर 2023 : राज्यात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. भ्रष्टाचाराच्या तक्रारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) गेल्यानंतर कारवाई केली जात आहे. नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील अभियंता अमित गायकवाड याला एक कोटींची लाच घेताना पकडण्यात आले. त्याचा सहकारी गणेश वाघ अजूनही फरार आहे. एसीबीकडून राज्यात कारवाई होत असते. परंतु त्यानंतर लोकप्रतिनिधीवर गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रकार अगदी नगण्य आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात टॉपमध्ये आहे. यासंदर्भात नॅशनल क्राइम ब्युरो २०२२चा अहवाल आला आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक भ्रष्टाचार होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे.

कोणते शहर पहिल्या क्रमांकावर

राज्यात ९४९ भ्रष्टाचाराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. देशात हे सर्वाधिक गुन्हे आहेत. यामुळे भ्रष्टाचारात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या यंदाच्या वर्षातील आकडेवारीनुसार भ्रष्टाचारात राज्यात नाशिक शहर पहिल्या क्रमांकावर आहे. शिक्षणाचे माहेरघर आणि देशातील सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराने भ्रष्टाचारात आघाडी घेतील आहे. पुणे शहर भ्रष्टाचाराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ या म्हणीप्रमाणे भ्रष्ट्राचारातही पुणे मागे नसल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचारामध्ये गेल्या वर्षी पुणे राज्यात पहिल्या क्रमांकावर होते. तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दंगलीमध्ये महाराष्ट्र अव्वल

देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात 8,218 दंगलीचे गुन्हे नोंदवण्यात आले. नॅशनल क्राइम ब्युरो २०२२चा अहवालात ही माहिती देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत नॅशनल क्राइम ब्युरोचे काम चालते. खून आणि हत्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र उत्तर प्रदेश, बिहारनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये महाराष्ट्रात 2,295 खून झाले होते. महाराष्ट्रात बलात्काराची 2,904 प्रकरणे घडली आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.