AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय

Maharashtra City-Wise Temperature / Heat Wave Today News : राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमान वाढत असताना अवकाळी पावसाचा फटकाही बसत आहे. पुढील ४८ तासांसाठी पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत गारपीट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Maharashtra Temperature : राज्यात पाऊस अन् तापमान वाढही, वाढत्या तापमानामुळे शासनाचा मोठा निर्णय
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 21, 2023 | 3:34 PM
Share

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक हैराण झाले आहेत. कधी कुठे पाऊस पडत आहे तर कधी ऊन प्रचंड तापले आहे. उष्माघाताचा त्रास लोकांना होत आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. आता पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave तर कुठे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात गारपिटीसह पाऊस होणार आहे. दरम्यान वाढत्या तापमानामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुण्यात गुरुवारी गारपीटही झाली होती.

काय आहे आयएमडीचा अंदाज

पुढील ४८ तासांत विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदीया आणि नागपूरसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी गारपीट होणार आहे. तर राज्यातील काही भागात तापमान वाढ होणार आहे. वाढत्या तापमानामुळे प्रशासकीय यंत्रणा देखिल सज्ज झाली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपचारांची दिशा, औषधांची उपलब्धता, याबाबत शासनातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना देण्यात आल्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळांना सुटी

राज्यातील सर्व शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर केली आहे. वाढत्या तापमानामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्यात वाढती उष्णतेची लाट पाहता शाळांना सुट्टी देण्याचे राज्य शासनाचे आदेश दिले आहे. विदर्भ वगळता इतर ठिकाणी आता सरळ 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. तर विदर्भात 30 जूनला शाळा सुरू होणार आहे. राज्य शासनाने याबाबत आदेश काढला आहे.

कुठे किती आहे तापमान

Maharashtra temperature on 20th April 2023
शहर तापमान
जळगाव 41.7
सातारा 37.6
मुंबई 37.3
ठाणे 38
सोलापूर 41.1
परभ़णी 40
सांगली 38.6
बीड 39.7
बारामती 38.7
धारा़शीव 39.8
मालेगाव 42
जालना 39.8
नांदेड 38.2
पुणे 38.4

उष्णघातापासून अशी घ्या काळजी

उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त वेळ बाहेर राहू नका

उन्हात बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका. उन्हात जाताना कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने शरीर झाकून ठेवा.

आरामदायी कपडे घाला

उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे परिधान करा.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.