AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहा शिक्षणासाठी मुलांना कशी करावी लागतेय धोकादायक कसरत, थर्माकोलची नाव, सापांशी सामना अन्…

Pune News : देशात मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना आहेत. सहा ते १४ वर्षांच्या मुलांसाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. परंतु गावपातळीवर परिस्थिती वेगळीच आहे. असेच हे एक गाव आहे जेथे...

पाहा शिक्षणासाठी मुलांना कशी करावी लागतेय धोकादायक कसरत, थर्माकोलची नाव, सापांशी सामना अन्...
| Updated on: Aug 27, 2023 | 1:01 PM
Share

पुणे | 27 ऑगस्ट 2023 : मुलांच्या शिक्षणास प्राधान्य देणाऱ्या अनेक योजना देशात राबवल्या जात आहेत. शिक्षण हक्क कायदा करुन मुलांना शिक्षणाचा हक्क दिला गेला आहे. मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी माध्यान भोजन योजना आहे. एकही मुल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी दुर्गम भागात शाळा उघडल्याचे दावे केले जात आहेत. परंतु त्याचवेळी शाळेत जाण्यासाठी मुलांना धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पुणे-औरंगाबाद मार्गावरील एका गावात दिसत आहे.

काय आहे त्या गावातील परिस्थिती

औरंगाबाद जिल्ह्यातील धनोरा गाव पुणे-औरंगाबाद महामार्गापासून फक्त पाच किलोमीटरवर आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे हे गाव दोन भागात विभागले गेले. गावात दुसऱ्या भागात शाळा आहे. यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी मुलांना नावेतून प्रवास करावा लागतो. मुलांकडे नाव नाही. मग थर्माकोलची नाव त्यांच्या पालकांनी बनवली. तिचा वापर करुन मुले शाळेत जातात. परंतु त्यांचे आव्हान येथेच संपत नाही. पाण्यात विषारी सापही असतात. त्यांना दूर करण्यासाठी आम्हाला नेहमी काठीचा वापर करावा लागत असल्याचे अकरा वर्षीची प्राजक्ता काळे हिने सांगितले.

परिस्थिती 47 वर्षांपासून तशीच

गावातील ही समस्या आताच निर्माण झालेली नाही. गेल्या 47 वर्षांपासून ही परिस्थिती आहे. धनोरा गावाच्या तीन बाजूला पाणी आहे. शिवना नदीसुद्धा गावाला लागून आहे. या नदीवर पूल नाही. जर मुलांनी पाण्यातून प्रवास केला नाही तर त्यांना 25 किमी चिखलातून रोज प्रवास करावा लागेल. गावकऱ्यांना या ठिकाणी पूल हवा आहे. त्यासाठी ते अनेक वर्षांपासून मागणी करत आहे.

तहसीलदाराने केला अहवाल

गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. त्याचा अहवाल तयार केला आहे. त्यांनी म्हटले की, जायकवाडी प्रकल्पाच्या वेळी संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु काही परिवारांना आपल्या शेतातच राहायचे आहे. यामुळे त्यांच्या मुलांना पाण्यातून प्रवास करावा लागतो. हा प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला होता.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.