AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात दोन नेत्यांमध्ये जुंपली, माझ्यावर टीका केली तर तुमचा घोटाळा काढणार…

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दोन नेत्यांमध्ये अनेकवेळा वाद निर्माण होता. आता पुन्हा या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष पाहायला मिळत आहे. २०२४ मध्ये जनता कोणासोबत आहे, हे दाखवून देईल, अन्यथा निवृत्ती घ्यावी, असे आव्हान या नेत्यांनी दिले.

पुण्यात दोन नेत्यांमध्ये जुंपली, माझ्यावर टीका केली तर तुमचा घोटाळा काढणार...
harshvardhan patil and dattatray bharne
| Updated on: Jun 11, 2023 | 12:48 PM
Share

योगेश बोरसे, पुणे : पुणे जिल्ह्यातील राजकारणावर शरद पवार यांचे वर्चस्व आहे. परंतु आता इतर पक्षांनीही आपले अस्तित्व पुणे जिल्ह्यात निर्माण केले आहे. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून त्या पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्न होत असतो. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दोन नेत्यांचा वाद अनेक वेळा यापूर्वी समोर आला आहे. आता पुन्हा दोन माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत. एकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्याची भाषा झाली आहे. तसेच पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कोणामध्ये सुरु झाला वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यांवर तोफ डागली आहे. माझ्यावर टीका केली तर मी तुमच्या कारखान्यातील सगळ्या भानगडी बाहेर काढेल, असा इशारा दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिला आहे. हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्यातील साखर अन् इथेनॉल त्यांनी कोणत्या दराने विक्री केली? याची चौकशी करण्याची वेळ आलीय, असा आरोप त्यांनी केला आहे. आपण हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यातील गैरकारभार बाहेर काढणार असल्याचा इशारा दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे.

तर राजकारणातून निवृत्ती घेईल

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यांवर टीका करताना दत्तात्रय भरणे चांगलेच आक्रमक झाले. हर्षवर्धन पाटील यांना दोन वेळा जनतेने नाकारले आहे. तरी हे शांत घरी बसत नाहीत. आता २०२४ मध्ये पुन्हा समोरासमोर येऊ या. मी कमी पडलो तर 2024 ला लोक मला नाकारतील. त्यानंतर मी शांतपणे घरी बसेल, परंतु जनतेने त्यांना नाकारले तर त्यांनी राजकीय निवृत्ती घ्यावी, असे आव्हान माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले.

यापूर्वी केली होती टीका

राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे मंत्री असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे विनाकारण फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी टीका माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यांवर नाव न घेता केली होती.

हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी वॉररूम बनवली आहे. त्याठिकाणी कारखान्याचे अन् शिक्षण संस्थेतील कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यांकडून सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्याचे काम सुरू असल्याची टीकाही भरणे यांनी यापूर्वी केली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.