AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, मुंबईतील बिल्डरांचे अनेक प्रकल्प दिवाळखोरीत, अनेकांनी केले होते फ्लॅटचे बुकींग

Pune Real Estate Sector : रिअल इस्टेट सेक्टर क्षेत्राला सध्या धक्का बसला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने राज्यातील 308 प्रकल्प दिवाळखोरीकडे जात असल्याचे म्हटले आहे. त्यात पुणे, मुंबईतील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

पुणे, मुंबईतील बिल्डरांचे अनेक प्रकल्प दिवाळखोरीत, अनेकांनी केले होते फ्लॅटचे बुकींग
real estate projectImage Credit source: tv9 network
| Updated on: Apr 26, 2023 | 5:04 PM
Share

पुणे : सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न असते. त्यासाठी तो आयुष्यभराची पुंजी जमा करतो आणि आपले एक छोटे घर बुक करतो. परंतु सध्या विविध कारणांनी अनेक बिल्डरांचे प्रकल्प दिवाळखोरीकडे जात आहेत. त्यातील काही प्रकल्प बंद झाले आहे तर काही सुरु आहेत. दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या प्रकल्पांची संख्या 308 आहे. महारेरा म्हणजेच महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. पुणे शहरातील 63 प्रकल्पांनाही फटका बसला आहे. महारेराने सर्व प्रकल्पांबाबत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

का झाली दिवाळखोरी

महाराष्ट्रातील 308 गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये दिवाळखोरी वाढली आहे, त्यापैकी 115 अद्याप सुरू आहेत आणि 193 आधीच बंद झाले आहेत. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट झाले आहे. विविध बँका, वित्तीय संस्था आणि इतर पतपुरवठादारांनी या 308 प्रकल्पांविरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली आहे.

कुठे किती प्रकल्प

मुंबई महानगरात 233, पुण्यात 63 आणि अहमदनगरमध्ये पाच, सोलापूरमध्ये चार आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगली येथे प्रत्येकी एक प्रकल्प दिवाळखोरीत आले आहे. बंद पडलेल्या 193 प्रकल्पांपैकी 150 प्रकल्पांमध्ये 50% पेक्षा जास्त जणांनी फ्लॅटची बुकींग केली आहे. महारेराकडून सर्व प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी छाननी होते.

ठाण्यातील सर्वाधिक 100 प्रकल्प

दिवाळीखोरीला आलेल्या 308 प्रकल्पांपैकी 100 प्रकल्प ठाणे जिल्ह्यात, त्यानंतर 83 मुंबई उपनगरात आणि 63 पुणे जिल्ह्यात आहेत. पालघरमध्ये 19 प्रकल्प, रायगड 15, अहमदनगरमध्ये पाच, सोलापूर चार, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूर, आणि सांगली येथील एक एक प्रकल्पाचा समावेश आहे.

सुरु असलेले प्रकल्प

सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये ठाणे परिसरातील 50, मुंबई उपनगरातील 31, मुंबई शहरात 10, पुणे आणि रायगडमधील प्रत्येकी आठ, अहमदनगरमधील पाच, पालघरमधील दोन आणि सोलापूरमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. रखडलेल्या प्रकल्पांची संख्या १९३ असून, पुण्यात ५५, मुंबई उपनगरात ५२, ठाण्यात ५०, पालघरमध्ये १७, रायगडमध्ये सात, मुंबईत पाच आणि सोलापूरमध्ये तीन प्रकल्प आहेत.

पुणे शहरात विक्रमी दर

पुणे शहरातील भूखंड विक्रीचा यंदा विक्रम झाला आहे. सण 2022 मध्ये अडीच हजाराहून जास्त जणांनी भूखंड खरेदी केली आहे. एकूण 2582 पुणेकरांकडून नवीन जमिनीची खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. पुणे शहरात गेल्या दहा वर्षात यंदा सर्वात जास्त जमिनीची खरेदी झाली आहे. खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, यामुळे जमिनीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे.

हे वाचा

पुणे शहरातील भूखंडांना सोन्यासारखी झळाळी, दहा वर्षात जमीन खरेदीचा यंदा विक्रम

पुणे शहरात घर घेणे होणार अवघड, किंमती वाढणार, काय आहे कारण

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.