पुणेकरांना मिळणार दोन वंदे भारत, मुंबईत सुरु होणार सातवी वंदे भारत ट्रेन

New Vande Bharat From Pune: पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची आज ट्रायल रन होणार आहे. सकाळी अकरा वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस पुण्याकडे धावणार आहे. आठ डब्यांची भारत रेल्वे विना प्रवासी धावणार आहे.

पुणेकरांना मिळणार दोन वंदे भारत, मुंबईत सुरु होणार सातवी वंदे भारत ट्रेन
वंदे भारत
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 10:40 AM

पुणे आणि मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. पुणे अन् मुंबईतून वंदे भारत सुरु होणार आहे. पुणे शहरातून अद्यापपर्यंत स्वतंत्र वंदे भारत ट्रेन नाही. परंतु आता पुण्यातून स्वतंत्र वंदे भारत येत्या सोमवारपासून सुरु होणार आहे. तसेच मुंबईवरुन कोल्हापूर जाणारी वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. यामुळे पुणेकरांना येत्या सोमवारपासून दोन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. मुंबईवरुन सातवी वंदे भारत ट्रेन सुरु होणार आहे. भारतातील सेमी हायस्पीड असलेल्या वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. यामुळे विविध ठिकाणांवरुन ही ट्रेन सुरु करण्याची मागणी होत आहे.

पुण्याच्या पहिल्या वंदे भारतचे उद्या १६ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. उद्यापासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण होणार आहे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्यातून तिसरी वंदे भारत, स्वतंत्र पहिली गाडी

पुणे शहरातून आणखी दोन ट्रेन सुरु होत असल्यामुळे पुण्याला तीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. यापूर्वी पुण्यावरुन मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरु आहे. त्यानंतर 16 सप्टेंबरपासून सुरु होणारी मुंबई कोल्हापूर वंदे भारत ट्रेनही पुण्यावरुन जाणार आहे. तसेच पुणे ते हुबळ ही स्वतंत्र ट्रेनही 16 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे पुण्यातून तीन तर मुंबईतून सातवी ट्रेन मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

आज होणार ट्रायल रन

पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची आज ट्रायल रन होणार आहे. सकाळी अकरा वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस पुण्याकडे धावणार आहे. आठ डब्यांची भारत रेल्वे विना प्रवासी धावणार आहे. त्यानंतर सोमवार 16 सप्टेंबरपासून ही ट्रेन सुरु होणार आहे. कोल्हापूर पुणे आणि पुणे हुबळी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता प्रवाशांना घेऊन वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरातून पुण्याच्या दिशेने धावणार आहे. आठवड्यातून तीन दिवस असणार पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे.

मुंबईवरुन सातवी वंदे भारत

मुंबईवरुन सहा वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता मुंबई कोल्हापूर ही सातवी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. सध्या मुंबई आणि कोल्हापूर दरम्यान सर्वात वेगाने धावणारी ट्रेन महालक्ष्मी एक्सप्रेस आहे. ही ट्रेन 518 किलोमीटर आंतर 10.5 तासांत पूर्ण करते. तिचा सरासरी वेग 48.94 किलोमीटर प्रतितास आहे. महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संख्या आता अकरा होणार आहे.

अशी असणार वंदे भारत

  • वंदे भारत एक्स्प्रेसला आठ डबे असतील आणि ती पूर्णपणे वातानुकूलित असेल.
  • हुबळी-पुणे वंदे भारत सोमवार वगळता आठवड्यातील प्रत्येक दिवशी धावेल.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.