AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांना किती टक्के मार्क मिळायचे, विद्यार्थ्यांसमोरच केला खुलासा

माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर क्रिकेटचा प्रवास सुरु झाला.

शरद पवार यांना किती टक्के मार्क मिळायचे, विद्यार्थ्यांसमोरच केला खुलासा
| Updated on: Mar 05, 2023 | 7:07 AM
Share

नविद पठाण, बारामती : मी कधी नापास झालो नाही…पण ३५ टक्क्यांच्या पुढेही गेलो नाही… नेहमी मार्ग काढण्याची मानसिकता ठेवली…संकटातून मार्ग काढण्याची मानसिकता असली की अपयश येत नाही...यामुळे शैक्षणिक क्षेत्रात कष्ट करा… पण कमी मार्क मिळाले म्हणून चिंता करु नका… फार चांगले गुण मिळाले तो विद्यार्थी यशस्वी होतो, असे नाही… ३५ % गुण मिळवणारा विद्यार्थीही यश मिळवतो हे मी अनुभवले आहे…म्हणून मेहनत करा, पण मार्क पाहू नका,  असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्या प्रतिष्ठानच्या तारांगण युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलू उघड केले.

क्रिकेटमध्ये कसे गेले

क्रिकेटमध्ये कसे गेले, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, माझे सासरे सदूराव शिंदे भारतीय संघातील खेळाडू. ते गुगली बॉलर होते. त्यामुळे माझ्या लग्नात अनेक क्रिकेटपटू आले होते. त्यानंतर या सर्व खेळाडूंशी जवळीक निर्माण झाली. मग मी गरवारे क्लबचा अध्यक्ष झालो. त्यावेळी क्लबमध्ये काहीवाद होते.ते मिटत नव्हते.

मी हे वाद मिटवायचा प्रयत्न केला. गरवारे क्लबनंतर मुंबई क्रिकेटची निवडणूक लढवली. पुढे जाऊन भारतीय क्रिकेट मंडळ म्हणजे बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर मी क्रिकेटचा राजीनामा दिला. तेव्हापासून परत तिकडे पाहिले नाही.

सामान्य माणूस महत्वाचा

आपली सर्वात चांगली उपलब्धी कोणती? त्यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, मी सतत सामान्य माणसाशी संवाद साधतो. त्यांच्यात माझा वावर असतो.

महत्वाचे निर्णय घेताना सामान्य माणसांकडून शिकायला मिळते. कारण ते राजकारण्यांपेक्षा शहाणे असतात. सामान्य माणसाच्या शहाणपणावर विश्वास ठेवला तर अपयश येणार नाही. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील सामान्य माणसाचा शहाणपणा लक्षात घ्या. तुम्ही मागे राहणार नाही.

साताऱ्यातील सभा

शरद पवार यांनी पावसातली सभेची आठवण सांगितली. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी साताऱ्यात ही सभा झाली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, साताऱ्याच्या सभेचं श्रेय माझ्याकडे नाही. मी बोलायला उभं राहिलो पाऊस आला. मला वाटलं आता सभा संपली.

पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांना ऐकायचंय. मग मी बोलत राहिलो. लोकांनी ऐकलं. अन् आमचा उमेदवारही निवडून दिला. त्या सभेचा व्हिडिओ सर्वत्र फिरले. राज्यभरातून त्याचे कौतुक झाले. ती सभा ऐतिहासिक ठरली होती.

हिंजवडीत होणार होता साखर कारखाना, पण कसा झाला आयटी पार्क, पवार यांनी सांगितला इतिहास

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.