AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालिका निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव, ‘इथल्या लोकांनी 6 वेळा निवडून दिलं’ म्हणत भावनिक साद

शरद पवार यांनी आज (16 ऑक्टोबर) बोलताना पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना भावनिक साद घातली. यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. याठिकाणच्या नागरिकांनी मला सहा वेळा मला लोकसभेत पाठवलं, असं भावनिक वक्तव्य केलं.

पालिका निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव, 'इथल्या लोकांनी 6 वेळा निवडून दिलं' म्हणत भावनिक साद
SHARAD PAWAR
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 4:57 PM
Share

पुणे : राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्यात आगामी काळात लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या रणांगणात खुद्द शरद पवारदेखील उतरल्याचं दिसतंय. पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिंकण्यासाठी पवार यांनी योजना आखायला सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्या पुणे येथील बैठका आणि भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यांनी आज (16 ऑक्टोबर) बोलताना पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना भावनिक साद घातली. यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. याठिकाणच्या नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं, असं भावनिक वक्तव्य केलं.

येथील नागरिकांनी सहा वेळा लोकसभेत पाठवलं 

शरद पवार आज पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीलाच पिंपरी चिंचवड तसेच पुण्यावर बोलताना भावनिक भाष्य केलं. “यापूर्वी मी या भागाचे प्रतिनिधित्व केलं होतं. येथील नागरिकांनी मला सहा वेळा लोकसभेत पाठवलं. यापूर्वी या ठिकाणी माझं जास्त जाणं-येणं असायचं पण आता जबाबदाऱ्या बदलल्या आहेत. त्यामुळे येणं-जाणं कमी झालं आहे,” असे भावनिक उद्गार शरद पवार यांनी काढले.

निकालानंतर काय ते समजेल

दरम्यान, पुणे महानगपालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ही सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेस, शिवसेना तसेच राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. येथे आमचीच एकहाती सत्ता येणार असा दावा प्रत्येक पक्ष करत आहे. तर प्रत्यक्ष निकालच विरोधकांना उत्तर देईल असे भाजप नेते सांगताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पुण्याचा महापौर फक्त शिवसेनेचाच होईल असं भाष्य केलं होतं. तर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला होता. इतर ठिकाणी काय परिस्थिती झाली हे राऊतांना माहिती आहे. राऊत माझ्यापेक्षा मोठा माणूस आहे. पण निवडणुकीनंतर संजय राऊतांना काय ते कळेल, असे गिरिश बापट म्हणाले होते.

इतर बातम्या :

‘आंतरराष्ट्रीय दर कमी झाले तरी पेट्रोल डिझेल महागच,’ मोदी सरकार शरद पवारांच्या निशाण्यावर

3 हजार कोटी दिले नाहीत म्हणून कोळश्याचा पुरवठा थांबवला, मग राज्याचे जीएसटीचे 35 हजार कोटी कसे थांबवता?; शरद पवारांचा केंद्राला सवाल

रुम साफ करण्याचे हजार रुपये देतो सांगत हॉटेलमध्ये नेलं, नंतर सहा नराधमांकडून संतापजनक कृत्य

(sharad pawar comment on pune pimpri chinchwad municipal corporation electionsaid people elected me for six times)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.