मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना धक्का, या महत्वकांक्षी प्रकल्पाला ब्रेक

eknath shinde and uddhav thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांची महत्वकांक्षी योजना सरकारने बंद करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक केंद्र बंद करण्यात आली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना धक्का, या महत्वकांक्षी प्रकल्पाला ब्रेक
eknath shinde and uddhav thackeray
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 9:57 AM

अभिजित पोते, पुणे | 16 नोव्हेंबर 2023 : राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेवर आले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडत ४० आमदारांसह एकनाथ शिंदे भाजपसोबत आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद घेतल्यापासून उद्धव ठाकरे सरकारच्या अनेक योजनांना ब्रेक लावला. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला ब्रेक लावला आहे. पुणे येथे सुरु असलेल्या 51 शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्यात आले आहे. आता पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथे फक्त 35 केंद्रच सुरू आहे. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपावरुन अनेक केंद्र सरकारने बंद केली आहेत. ही योजना बंद करण्याकडे पाऊल म्हणजे उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जात आहे.

काय होती शिवभोजन थाळी  योजना

उद्धव ठाकरे सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरु केली होती. त्यात एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात आणि वरण दिले जात होते. या केंद्रासाठी राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागात एका थाळीमागे 50 रुपये अनुदान दिले होते तर शहरी भागात 35 रुपये अनुदान एका थाळीमागे देण्यात येत होते. ग्राहकांकडून या थाळीसाठी दहा रुपये घेतले जात होते. परंतु या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने सरकारकडून व्यक्त केला गेला. यामुळे ही योजना बंद करण्याचा विचार सुरु झाला.

हे सुद्धा वाचा

पुणे शहरात कायमस्वरुपी लावले टाळे

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवभोजन थाळी केंद्राला कायमस्वरूपी टाळे लावण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तब्बल 51 शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्यात आले आहे. यामधील काही केंद्रांमध्ये गैरव्यवहार झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर काही केंद्रचालकांनी परवडत नसल्याने स्वत:हून या योजनेतून माघार घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पुणे जिल्ह्यात एकूण 86 शिवभोजन थाळी केंद्र कार्यरत होती. जिल्ह्यात आता केवळ 35 केंद्रच सुरू आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.