AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा पुतळा जाळा, जोडे मारा, जितेंद्र आव्हाड यांचा फोन; शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपाने खळबळ

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. श्रीकांत शिंदे आजारी आहेत, त्यामूळे ते यावर बोलणार नाहीत. बदनाम करणं हा संजय राऊत यांचा डाव आहे.

अजित पवार यांचा पुतळा जाळा, जोडे मारा, जितेंद्र आव्हाड यांचा फोन; शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
jitendra awhad Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 23, 2023 | 9:54 AM
Share

पुणे : जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा जाळून टाकण्यास सांगितलं होतं. अजित पवार यांच्या पुतळ्याला जोडे मारा असं आम्हाला फोनवरून सांगण्यात आलं होतं. राष्ट्रवादीनेच अजितदादांच्या बदनामीचा कट रचला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. म्हस्के यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी गुंडांवर बोलूच नये. त्यांच्यासोबत फक्त तेच लोक फिरतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलून संजय राऊत मातोश्रीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. निवडणुकीनंतर पुण्यात ठाकरे गटात भूकंप होणारच आहे. ठाकरे गटातील सर्व नेते शिवसेनेत येतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केला.

सुषमा अंधारे यांच्यावर टीका

यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. आपण एखाद्या व्यक्तीला वरिष्ठ मानत असू तर त्यांना पितृतुल्य मानतो ना. अंधारे मॅडम यांचं उद्धव ठाकरेंबाबत काय मत आहे? याच सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांना म्हातारा म्हणाल्या होत्या. ही त्यांची संस्कृती आहे. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना खांद्यावर घ्यावं असंही त्या म्हणाल्या होत्या. आता त्यांची ही विधाने बदलली काय? असा सवाल त्यांनी केला.

राऊत, पुरावा द्या

संजय राऊत यांनी आरोप केला. त्यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांना पत्र दिलं. त्यांनी चौकशीची मागणी केली. ठाणे पोलीस त्यांचा जबाब घेत आहेत. यावेळी राऊत यांनी आपल्या बिनबुडाच्या आरोपावरून घुमजाव केलं आहे. कबड्डी स्पर्धेच्यावेळी माझ्या अंगावर शाई फेकणार होते. काळे फासणार होते, असं आता राऊत जबाबात सांगत आहेत. त्यांना हे सगळं कसं कळालं हे राऊत यांनी सांगावं.

तुम्हाला धमकीचा फोन आला असेल तर सांगावं. राऊत यांनी आपल्या जबाबावेळी कोणताही पुरावा दिला नाही. त्यांनी पुरावा द्यावा. हवेत बोलू नये. एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचं काम राऊत करत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. संतापलेले शिवसैनिकच एक दिवस संजय राऊत यांना चोपून काढतील, असा इशाराच त्यांनी दिला.

गुंड घेऊन का फिरता?

संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे आता सगळ्यांना कळून चुकलं आहे. राऊत यांच्यामुळेच आनंद दिघे यांना टाडा लागला होता. तुम्ही मर्द आहात तर गुंड घेऊन का फिरता?, असा सवाल त्यांनी केला.

राऊत यांची चौकशी होणार

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. श्रीकांत शिंदे आजारी आहेत, त्यामूळे ते यावर बोलणार नाहीत. बदनाम करणं हा संजय राऊत यांचा डाव आहे. ही लिहिली गेलेली स्क्रिप्ट आहे. राऊत यांनी दोन हजार कोटी रुपयांचा आरोप केला. त्याचीही चौकशी होणार आहे. यावर निवडणूक आयोगच निर्णय घेईल.

ठाकरे यांच्या सोबत जे आहेत त्यांना फोडण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. त्यांच्याकडे संजय राऊत नावाचा कार्ड आहे. लोक आपोआप आमच्याकडे येतील, असा चिमटा त्यांनी काढला. शरद पवार यांनी संजय राऊत यांना शिवसेना संपवण्याची सुपारी दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.