AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फक्त छगन भुजबळ नाहीत तर अनेकजण नाराज’, बड्या व्यक्तीचा मोठा दावा

महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन आता 15 दिवस झाली आहे. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही नुकताच झाला आहे. तसेच विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशनही पार पडत आहे. असं असताना नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अद्याप पार पडलेलं नाही. त्याबाबत बड्या नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

'फक्त छगन भुजबळ नाहीत तर अनेकजण नाराज', बड्या व्यक्तीचा मोठा दावा
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ
| Edited By: | Updated on: Dec 19, 2024 | 10:20 PM
Share

“राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. पण नाराजांची यादी किती सांगू. एकावर एक नाराजी आहे. हे जनतेने दिलेले बहुमत आहे की दाखवलेले बहुमत आहे? अशी शंका निर्माण होते”, असे वक्तव्य माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. ते सांगलीच्या तासगावमध्ये शिवार कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राज्यात नवं सरकार स्थापन झालं असलं तरी नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही, यावरुन त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

“निवडणुकीचा निकाल लागून महिना होऊन गेला. मुख्यमंत्री ठरायला वेळ लागला. खातेवाटप अजून झालेलं नाही. नागपूरचे अधिवेशन झाले. मात्र खातेवाटप झाले नाही. हे तिघेच प्रश्नाचे उत्तर देणार होते तर एवढ्या मंत्र्यांचा पसारा करायचं कारणच काय होते? म्हणजे सर्व आनंदी आनंदच आहे. ज्यांना काही मिळाले नाही ते आपापल्या मतदारसंघात गेले आहेत, आणि रुसलेले आहेत”, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

“अशा पद्धतीने सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे. खरंतर जनतेने यांना खरोखर जनमत दिले आहे काय? अन्य मार्गाने सत्येवर आलेत मला माहित नाही. जनतेने निवडून दिले असेल तर हा जनतेचा अपमान आहे. कारण तशा पद्धतीने यांचं कामकाज सुरू आहे”, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

‘बाबसाहेबांचं नाव घेतल्यावर यांना वाईट का वाटतंय?’

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाचे अभिमान आणि आत्मसन्मान आहेत. बाबासाहेबांच्या संविधानामुळे अनेक जण संसदेत गेले. असे असताना वक्तव्य करणे म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांना शोभत नाही आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पंतप्रधान समर्थन करतात हे योग्य नाही. बाबसाहेबांचं नाव घेतल्यावर यांना वाईट का वाटतंय? मला ते कळत नाही. त्याच्या मनात जी वळवळ आहे ती ओठातून व्यक्त झाली”, असं राजू शेट्टी म्हणाले. तसेच “गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिला नाही. कायदा-सुव्यवस्था आहे की पुस्तकातच आहे? हे कळेना झाले आहे”, अशी देखील टीका राजू शेट्टी यांनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.