AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली, मराठा समाजाने ईडब्लूएसचं आरक्षण घ्यावं : संभाजी ब्रिगेड

"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची दिशाभूल केलीय", अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली (Sambhaji Brigade chief Praveen Gaikwad slams BJP).

देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली, मराठा समाजाने ईडब्लूएसचं आरक्षण घ्यावं : संभाजी ब्रिगेड
| Updated on: Feb 07, 2021 | 5:07 PM
Share

रत्नागिरी : “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाची दिशाभूल केलीय. 50 टक्के आरक्षणामध्ये ओबीसी समाजाला केवळ 19 टक्केच आरक्षण मिळतं आणि या 19 टक्क्यांमध्ये जर मराठा समाजाला समाविष्ट केलं तर ओबीसी समाजावर अन्याय होईल. कुठलाही राजकीय पक्ष 50 टक्के आरक्षणाचं समर्थन करत नाही. त्यामुळे ईडब्लूएसचं आरक्षण मराठा समाजाने घ्यावे”, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मांडली. चिपळूनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Sambhaji Brigade chief Praveen Gaikwad slams BJP).

“मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकाने मराठा समाजाची दिशाभूल केली. भाजपने मराठी आंदोलनाचं केवळ राजकारणच केलं. ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण होईल, असं भाजपने बघितलं. संभाजी ब्रिगेडने ईडब्लूएसचं आरक्षण मिळावं, अशी मागणी केलीय. एसीबीएसचा कायदा राज्य सरकार करतेय. पण तो अधिकार राज्य सरकारला नाही. ओबीसींचा आयोग केवळ शिफारस करु शंकतं”, असं प्रवीण गायकवाड म्हणाले (Sambhaji Brigade chief Praveen Gaikwad slams BJP).

“शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांच जोरदार आंदोलन सुरु आहे. भाजप सरकार हे केवळ शेतकरी विरोधी नाही तर मानवता विरोधी आहे. भाजपने व्यापार-उद्योगाला पोषक आणि जागतिकरणाच्या तरतुदीप्रमाणे कायदे तयार केलेत. लोकशाहीत लोकांना जर हे कायदे नको असतील तर या कायद्यांसाठी अट्टाहास का?”, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला.

“शेतकऱ्यांच्या बाजूने संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरेल आणि संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने सरकारला येत्या काही दिवसात उत्तर देईल”, असा सूचक इशारा प्रवीण गायकवाड यांनी केंद्र सरकारला दिला.

मराठा आरक्षणाचा खटला पुढे ढकलला

मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती. आता थेट 8 मार्चपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. 8 ते 10 मार्चला विरोधक आपली बाजू मांडणार आहेत. तर 12 ते 17 मार्चदरम्यान राज्य सरकार आपली मांडणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाची तारीख वारंवार पुढे ढकलल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार मजबुतीने उभं : छगन भुजबळ

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.