AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात आता ठाकरे गटाची उडी, मविआत मोठा भूकंप येण्याचे संकेत, सांगली भूकंपाचं केंद्रबिंदू ठरणार?

सांगली जिल्हा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची काय भूमिका असणार? याबाबत सांगली लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी चंद्रहार पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठा इशारा दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात आता ठाकरे गटाची उडी, मविआत मोठा भूकंप येण्याचे संकेत,  सांगली भूकंपाचं केंद्रबिंदू ठरणार?
महाविकास आघाडीत भूकंप येण्याचे संकेत, सांगली भूकंपाचं केंद्रबिंदू ठरणार? मविआत काय घडतंय?
| Edited By: | Updated on: Jun 16, 2024 | 4:24 PM
Share

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणुकीच्याआधीदेखील सांगली जिल्ह्यातील जागांवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं आहेत. सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या विजयानंतर तिथल्या स्थानिक काँग्रेस पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. विशाल पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतील इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघातील गावात जावून सूचक वक्तव्य केलं. आपलं या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष असेल, असं विशाल पाटील म्हणाले. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे देखील संबंधित कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनीदेखील आपल्या भाषणातून जयंत पाटील यांना इशारा दिला. यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभांच्या जागांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात वादाची ठिणगी पडलेली आहे, असं असताना या वादात आता ठाकरे गटानेदेखील उडी घेतली आहे.

डबल महाराष्ट्र केसरी आणि लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या दोन जागा लढवणारच, अशी भूमिका चंद्रहार पाटील यांनी मांडली आहे. खानापूर-मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार, असं चंद्रहार पाटील म्हणाले आहेत.

लोकसभेतील गद्दारी पुन्हा जिल्ह्यात कराल तर राज्यात किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला. चंद्रहार पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा इशारा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिक कष्टामुळे राज्यात काँग्रेस 1 वरून 13 वर आणि राष्ट्रवादी 4 वरून 8 वर गेली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेत चांगलीच गद्दारी केली, असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला.

महाविकास आघाडीत भूकंप येणार?

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत प्रचंड वाद झाले. ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा केल्यामुळे सांगलीच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाला काहीच मदत केली नाही. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनी तिथे बंडखोर उभा केला. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. या निवडणुकीत विशाल पाटील यांचा विजय झाला. यावरु ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. आता विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघात जावून शरद पवार गटाला इशारा दिला आहे. त्यामुळे सांगलीतल्या हालचालींमुळे महाविकास आघाडीत भूकंप येऊ शकतो. तसं घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे दूरगामी परिणाम पडतील. आगामी विधानसभा निवडणुकीचे निकाल मग काहीही लागू शकतील. तसेच या घडामोडींचं केंद्रबिंदू हे सांगली ठरेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.