AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut on Election Commission | ‘निवडणूक आयोगाला अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय’, वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊत यांची माघार नाहीच

संजय राऊत यांनी सांगलीत भाषण करताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली. त्यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही.

Sanjay Raut on Election Commission | 'निवडणूक आयोगाला अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय', वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊत यांची माघार नाहीच
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2023 | 5:26 PM
Share

सांगली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगलीत भाषण करताना केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) अर्वाच्य शब्दांत टीका केलीय. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिवीगाळ केलीय. त्यांच्या शिवीगाळचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याबद्दल राऊत यांना विचारलं असता त्यांनी ते विधान मागे घेतलं नाही. याउलट त्यांनी शिवीगाळचा व्हिडीओ व्हायरल होतोय तर होऊद्या व्हायरल. अख्खा महाराष्ट्र निवडणूक आयोगाला शिवीगाळ करत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

सांगलीतली संजय राऊत यांची सभा आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी असल्याचं म्हटलं. “उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा खरी शिवसेना असल्याचं जनतेने स्वीकारलेलं आहे. निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला असेल तो कागदावरचा निकाल आहे. हा लोकांच्या मनाचा निर्णय नाही. जर तु्म्हाला खरी शिवसेना कोणती हे ठरवायचं असेल तर आम्ही निवडणुकीला सामोरं जायला तयार आहोत. आता जनता ठरवेल की शिवसेना कोणाची”, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचं वादग्रस्त विधान नेमकं काय?

“संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50 खोके देवून पळून गेले आहेत. आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?”, असं संजय राऊत सांगलीच्या कार्यक्रमात म्हणाले.

राऊत आणखी भाषणात काय म्हणाले?

“खूप वर्षांनी मी सांगलीत आलोय. सांगलीत प्रवेश केल्यापासून रस्त्या-रस्त्यावर शिवसैनिकांनी स्वागत केलं. यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम बांधव होते. शिवसैनिकांनी गर्जना करत स्वागत केले. सांगलीचे आमदार-खासदार निवडून आले हे परत निवडून येणार का? 50 खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की जगात कुठली गोष्ट लोकप्रिय झाली नाही आणि वाऱ्यासारखी पसरली नाही. पण आतापर्यंत आम्ही बघितलं, हे वारे झाले ते वारे झाले. पण 50 खोके एकदम ओके हे अख्ख्या जगात पोहचलं आहे”, असं संजय राऊत आपल्या भाषणात म्हणाले.

“मुख्यमंत्री विषयी बोलणं योग्य नाही. सन्मान राखला पाहिजे. पण जर जनतेच्या भावना असतील तर मी काही बोलणार नाही. ज्यांनी शिवसेने सोडली त्यांना आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिंदे आणि चाळीस चोरांनी, दिल्लीच्या रंगा बिल्लांनी काय समजलं? निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातली. त्यानंतर राज्यात वणवा पेटला आहे”, असा दावा राऊतांनी आपल्या भाषणात केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.