AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?

एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घाम फुटला, जीव गुदमरण्याची वेळ, तब्बल सहा तासांपासून लाईट गेली, नेमकं कारण काय?
| Updated on: Jun 13, 2023 | 10:09 PM
Share

कल्याण : कल्याण पूर्वेच्या मलंगगड रोड मार्गावर राधाकृष्ण पार्क पासून आडीवली, नांदिवली, अनमोल गार्डन, द्वारलीपर्यंतच्या अनेक भागांमध्ये गेल्या साडेपाच तासांपासून लाईट गेली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या परिसरांमध्ये सकाळपासून लाईट ये-जा करत होती. पण संध्याकाळी चार वाजेपासून जी लाईट गेलीय ती अद्यापही परत आलेली नाही. त्यामुळे नागरीक उकाड्याने भयंकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे लाईट पुढचे आणखी तीन तास येणार नसल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये पसरली आहे. तसेच आम्ही महावितरणाचे पीआरओ अधिकाऱ्यांकडे फोनवर माहिती मिळवली असता त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला आहे.

कल्याण पूर्वेत मलंगगड रोडवर शंभर फुटी रोडजवळ विजेचा खांब कोसळला आहे. या भागात मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या नाल्याजवळ विजेचा खांब कोसळला आहे. त्यामुळे तिथून आजूबाजूच्या लांबच्या परिसरात विजेचा खोळंबा झालाय. अनेक परिसरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. अनेकांच्या घरात श्वास गुदमरतोय आणि अशा परिस्थितीत तब्बल पाच ते सात सात विजेचा खोळंबा होणं ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

घरात गरमी, बाहेर पाऊस आणि प्रचंड काळोख

कल्याण पूर्वेतील वातावरण दुपारपासून खराब आहे. या परिसरात अधूनमधून पाऊस पडतोय आणि घराबाहेर प्रचंड काळोख आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर सोडून बाहेर जाणं देखील डोकेदुखी आहे. कल्याण शहरात दाटीवाटीची वस्ती आहे. इथे लाखो नागरीक वास्तव्यास आहेत. त्यामुळे लोकसंख्येची घनता साहजिकच जास्त आहे. पण अशा परिसरात नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरतंय हा खरंच चिंतेचा विषय ठरला आहे.

पावसाचं वातावरण असल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं हे वास्तव आहे. अनेक लाईटमन हे अहोरात्र झटत असतात. हे अतिशय खरं आहे. पण तरीही तब्बल पाच ते सात तास विजेचा खोळंबा होणं अपेक्षित नाही, अशी भावना नागरिकांची आहे. एका मेट्रो सिटीत अशी घटना घडणं हे दुर्देवीच आहे. अनेकांना याचा फटका बसू शकतो.

लाईट कधी येणार?

दरम्यान, महावितरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरांमध्ये रात्री अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत लाईट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पुढचे आणखी दोन तास उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. विजेचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण कधी होईल, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.