Maharashtra Breaking News LIVE 14 October 2024 : मुंबईकरांनो एक छदामही भरू नका… आज रात्रीपासून मुंबईत टोलमाफी; सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 ऑक्टोबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
धारावी पुनर्विकासासाठी कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
धारावी पुनर्विकासासाठी कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवनार डंम्पिंग ग्राऊंडची जागा देण्यात येणार आहे.
-
परतीच्या पावसाने धुळे जिल्ह्याला जोडपून काढले
परतीच्या पावसाने संपूर्ण धुळे जिल्ह्याला जोडपून काढले आहे .साखरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणात पाण्याचा वेग वाढल्याने धरणातून 35000 क्यूसेस पाणी पांझरा नदी पात्रात सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
-
-
ती. जड वाहने सोडून आज रात्री १२ पासून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे – दादा भुसे
रोज साडेतीन लाख वाहने ये जा करतात. हलक्या वाहनांना टोलमाफी व्हावी अशी मागणी होती. जड वाहने सोडून आज रात्री 12पासून टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 45 व 75 रूपये टोल होता. 2026 पर्यंत टोलची मुदत होती. 2 लाख 80हजार वाहनांना फायदा होईल. आर्थिक भाराची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाईल, असे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.
-
नवी दिल्ली – वक्फ विधेयकावरील संसदेच्या संयुक्त समितीच्या बैठकीला सुरुवात
राजधानी दिल्लीमध्ये वक्फ विधेयकावरील संसदेच्या संयुक्त समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी अरविंद सावंत, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, मेधा कुलकर्णी उपस्थित आहेत. संयुक्त समिती आज विविध धर्मसंस्थांची मते जाणून घेणार आहे.
-
धुळे- अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्याने पांजरा नदीला पूर
धुळे- साखरी तालुक्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा धरणातून 35 हजार क्यूसेस पाणी पांजरा नदीच्या पात्रात सोडण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून साखरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याचा वेग वाढला आहे. काल रात्रीपासून पांजरा नदी पात्रात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येत आहे. आज सकाळी 35 हजार क्यूसेस पाणी सोडल्याने पांजरा नदीला पूर आला आहे. पांजरा नदीकिनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
-
Maharashtra News: वाशी, दहिसर, मुलुंड, आनंदनगर, ऐरोली टोल नाक्यावर टोलमाफी
वाशी, दहिसर, मुलुंड, आनंदनगर, ऐरोली टोल नाक्यावर टोलमाफी… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा… हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी… मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी…
-
Maharashtra News: नाशिकच्या सिडको परिसरात सराईत गुन्हेगारांचा पुन्हा हैदोस
तडीपार गुन्हेगारांनी परिसरात हैदोस घालत केली गाडीची तोडफोड… तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा केला प्रयत्न… दहशत निर्माण करण्याची घटना cctv कॅमेरात कैद… नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात संदीप दोंदे आणि तडीपार गुन्हेगार सिद्धार्थ दोंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
-
-
Maharashtra News: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक… राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार बैठक… आतापर्यंत बैठकीसाठी नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण रमेश चेनीथला दाखल…
-
Maharashtra News: समाजाचे पक्षाचे नेते अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर
19 ऑक्टोबरला अखिलेश महाराष्ट्र दौऱ्यावर… विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत… मुस्लिम बहुल मालेगाव विधानसभा मतदारसंघात अखिलेश यांचा कार्यक्रम… सध्या समाजवादी पक्षाचे दोन आमदार… महाराष्ट्रात जवळपास 18 जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता…
-
Maharashtra News: महाराष्ट्र कौशल्य विकास युनिव्हर्सिटीला रतन टाटांचं नाव
महाराष्ट्र कौशल्य विकास युनिव्हर्सिटीला रतन टाटांचं नाव… राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, मंत्री लोढांची माहिती…
-
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज महत्वाची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झालेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याने त्यावर आज चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार रणनिती बाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीला भाजपकडूनही पाठिंबा?
कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना भाजपच्या शिवाजी पाटील यांनी आव्हान दिलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावरून हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असताना आणि अजित दादांनी उमेदवारी जाहीर केलेली असताना प्रमोद सावंत यांनी परस्पर उमेदवारी जाहीर करणे बरोबर नाही. अजित दादा आणि भाजपचे वरिष्ठ याची योग्य ती दखल घेतील, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.
-
अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर येणार
समाजाचे पक्षाचे नेते अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. 19 ऑक्टोबरला अखिलेश महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मुस्लिम बहुल मालेगाव विधानसभा मतदारसंघात अखिलेश यांचा कार्यक्रम असणार आहे. सध्या समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. महाराष्ट्रात जवळपास 18 जागांवर समाजवादी पक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
-
शशिकांत कांबळे यांची अजित पवार गटाच्या प्रदेश चिटणीसपदी निवड
सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शशिकांत कांबळे यांची प्रदेश चिटणीसपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते शशिकांत कांबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. शशिकांत कांबळे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक असून समता परिषदेचे शहराध्यक्ष आहेत. पक्ष स्थापनेपासून ते राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहिले आहेत. पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल पक्षाचे त्यांनी आभार मानले आहेत.
-
Maharashtra News Live Update : कर्जतकरांचा पाणी प्रश्न सुटला, आमदारांच्या हस्ते नळ जोडणी योजनेचे भूमीपूजन
गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत मतदारसंघात पाण्याची समस्या भेडसावत होती, या गोष्टीची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन कर्जतमध्ये नळ जोडणी योजनेचे भूमीपूजन केले. त्यामुळे आता कर्जतकारांची पाण्याची समस्या कायमची दूर होणार असून येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
-
Maharashtra News Live Update : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे आज भूमिपूजन
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे आज भूमिपूजन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडेल. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित असणार आहे. 8 ऑगस्ट रोजी अचानक लागलेल्या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झाले होते. पुढच्या दीड वर्षांमध्ये हे नाट्यगृह पुन्हा सेवेत आणण्याचा प्रयत्न असणार आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडून 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
-
Maharashtra News Live Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. यावेळी येत्या विधानसभा निवडणुकांबद्दल घोषणा केली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Maharashtra News Live Update : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाली. सध्या याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. तसेच पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून विविध खुलासे समोर येत आहेत. तर दुसरीकडे आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आजच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Published On - Oct 14,2024 8:41 AM