AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

Vande Bharat Express | वंदे भारत एक्स्प्रेस देशात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. विविध राज्यातून ही एक्स्प्रेस सोडण्याची मागणी वाढत आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत पाच वंदे भारत एक्स्प्रेस धावत होत्या. आता सहावी ट्रेन मिळाली आहे. येत्या ३० तारखेपासून ही गाडी सुरु होणार आहे.

महाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
| Updated on: Dec 22, 2023 | 2:10 PM
Share

मुंबई, दि.22 डिसेंबर | देशभरात आकर्षक लूक आणि आपल्या वेगामुळे लोकप्रिय झालेली वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातून पाच ठिकाणी धावत आहे. आता महाराष्ट्राला सहावी रेल्वे मिळाली आहे. वंदे भारत लवकरच मराठवाड्यातून धावणार आहे. मध्य रेल्वेला वंदे भारतचे रॅक मिळाले असून मुंबई ते जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला ३० डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत रेल्वे अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णवो देवी, अमृतसर-नवी दिल्ली, जालना-मुंबई आणि  कोइंबतूर-बंगळूरु येत्या ३० तारखेपासून धावणार आहे. तसेच पूल-पूश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत नावाच्या दोन रेल्वे देशात प्रथमच धावणार आहेत.

महाराष्ट्राला मिळाली सहावी रेल्वे

महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. सहा दिवस धावणारी या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या. आता ३० डिसेंबरपासून मुंबई ते जालना ही रेल्वे सुरु होणार आहे. प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देत आहेत.

अमृत भारत रेल्वे प्रथमच दाखवणार

अमृत भारत रेल्वे नवी दिल्ली ते दरभंगा दरम्यान धावणार आहे. तसेत दुसरी गाडी मालदा-बंगळूरु दरम्यान चालवण्यात येणार आहे. श्रमिक कामगारांना लक्षात ठेऊन ही गाडी सुरु केली आहे. या रेल्वे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून सुरु करण्यात येणार आहे. तसेच अमृत भारत रेल्वे एसी-1,2,3 कोच असलेलीही धावणार आहे. राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे या गाडीचा वेग जास्तीत जास्त 130 किमी असणार आहे. पूल-पूश तंत्रज्ञान असल्यामुळे राजधानी-शताब्दीपेक्षा अधिक वेग या गाडीचा असणार आहे. अमृत भारत ट्रेनचा तिकीट दर सामान्य रेल्वे पेक्षा 10-15 टक्के अधिक असणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.