AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | पंजाबच्या शेतकऱ्यांनी कंगना रनौतला घेरलं, कार अडवत माफी मागण्याची केली मागणी

जोपर्यंत आमची माफी मागाणार नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा पंजाबच्या शेतकऱ्यांनी घेतला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कंगनाला शेतकऱ्यांच्या गराड्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

Kangana Ranaut | पंजाबच्या शेतकऱ्यांनी कंगना रनौतला घेरलं, कार अडवत माफी मागण्याची केली मागणी
KANGANA RANAUT
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 5:41 PM
Share

मुंबई : आपल्या खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्यांनी वादाचे कारण ठरणारी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंजाबमध्ये असताना येथील शेतकऱ्यांनी कंगनाची गाडी आडवली. तिच्या गाडीला शेतकऱ्यांनी चहू बाजूनंनी घेरले होते. तसेच जोपर्यंत आमची माफी मागणार नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कंगनाला शेतकऱ्यांच्या गराड्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.

शेतकऱ्यांनी कंगनाला घेरले

मिळालेल्या माहितीनुसार कंगना रनौत कारमधून पंजाबमधील चंदीगड-उणा महामार्गावरुन प्रवास करत होती. यावेळी येथील शेतकऱ्यांनी तिची कार थांबवत तिला घेरले. तसेच जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला. मात्र रस्त्यावर रहदारी वाढल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत कंगनाला संरक्षण दिले. तसेच तिची कार शेतकऱ्यांच्या गराड्यातून मुक्त केली. हा सर्व प्रकार घडत असताना कंगना रनौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.

मॉब लिंचिंगची शिकार झाले असते

“मी जेव्हा पंजाबमध्ये आले तेव्हा काही लोकांनी माझ्यावर हल्ला केला. आम्ही शेतकरी असल्याचे ते सांगत आहेत,” असे कंगनाने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. तसेच पंजाब पोलीस वेळेवर आले नसते तर आज मॉब लिंचिंगची मी शिकार झाले असते, असेदेखील कंगनाने म्हटले आहे.

कंगना सुरक्षित, इन्स्टाग्रामवर दिली माहीती

दरम्यान, पंजाब पोलिसांनी कंगनाला सुरक्षा पुरवत शेतकऱ्यांना बाजूला केले आहे. कंगनाला कोणतीही इजा झालेली नसून ती सुरक्षितपणे शेतकऱ्यांच्या गराड्यातून बाहेर पडली आहे. तशी माहिती तिने इन्स्टाग्रामवर दिलीय. कंगनाने पंजाब पोलिसांचे आभार मानले आहेत. याआधी दिल्लीच्या सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना कंगनाने खलिस्तानी म्हटले होते. तसेच कृषी कायदे परत घेतल्यानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत रस्त्यावर आंदोलन करणारे लोक कायदे तयार करत असतील तर हासुद्धा एक जिहादच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.

इतर बातम्या :

Bob Biswas Review : ‘सुपारी किलर’च्या भूमिकेत अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘बॉब बिस्वास’…

Brahma Mishra Death | मित्रासोबत धमाल डान्स, ‘ललित’ फेम ब्रह्मा मिश्राचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लगीन घटीका समीप आली! अंकिता-विकीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.