AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही कृषीमाल खरेदी करतच नाही; शेतकऱ्यांच्या बहिष्कारानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण

आम्ही केवळ भारतीय खाद्य निगमसाठी (FCI) केवळ भांडारांची निर्मिती करतो. | Adani group

आम्ही कृषीमाल खरेदी करतच नाही; शेतकऱ्यांच्या बहिष्कारानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण
| Edited By: | Updated on: Dec 10, 2020 | 7:46 AM
Share

नवी दिल्ली: दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी अदानी आणि अंबानी समूहावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यानंतर या कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आहेत. अदानी समूहाने या सगळ्यावर तातडीने आपली बाजू स्पष्ट केली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा कृषीमाल खरेदी करत नाही किंवा कृषीमालाची किंमत ठरवण्यातही आमची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगत अदानी समूहाने शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. (farmers announced boycott on Ambani and Adani group)

अदानी समूहाने ट्विटरवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आम्ही केवळ भारतीय खाद्य निगमसाठी (FCI) केवळ भांडारांची निर्मिती करतो. शेतकऱ्यांकडून किती प्रमाणात धान्य घ्यावे किंवा त्याची किंमत काय असावी, हे ठरवण्याचे कोणतेही अधिकार आम्हाला नाहीत. आम्ही केवळ FCI ला धान्याच्या साठवणुकीची सुविधा पुरवतो आणि त्याची देखभाल करतो. शेतकऱ्यांकडून किती आणि कोणत्या दराने कृषीमाल खरेदी करायचा, याबाबतचे निर्णय भारतीय खाद्य निगमच घेते, असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले.

FCI नेमके काय करते?

FCI कडून खासगी कंपन्यांना धान्याच्या भांडारांसाठी शुल्क अदा केले जाते. मात्र, या कंपन्यांना या धान्याच्या विपणन आणि वितरणाचा अधिकार नाही. सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी (PDS) धान्य खरेदी आणि ते एका जागेहून दुसऱ्या जागी पोहोचवणे या गोष्टी FCI च्या अखत्यारित येतात.

शेतकऱ्यांचा नेमका आक्षेप काय?

मोदी सरकारने अदानी आणि अंबानी समूहाच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अदानी समूहाकडून धान्याची मोठ्याप्रमाणावर आणि दीर्घकाळ साठवणूक करण्यासाठी गोदामांची निर्मिती केली जात आहे. जेणेकरून नंतर हे धान्य त्यांना अधिक किंमतीने विकता येईल.

‘जिओ सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही’

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे कॉर्पोरेट्ससाठी लागू केले आहेत. बड्या उद्योगपतींचा फायदा करण्यासाठी सरकारने हा कायदा लागू केला आहे. मात्र, आता आम्ही जिओ सिमपासून रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहोत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या पेट्रोलपंपावरही बहिष्कार टाकू. त्यांच्या पेट्रोलपंपवरुन पेट्रोल घेणार नाही, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांना दिला आहे.

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलन Live Update | शेतकरी कायदे रद्द करा, विरोधी पक्षांची मागणी

MSP कायम ठेवणार, सरकारचं आश्वासन; कायदेच रद्द करा, शेतकरी मागणीवर ठाम

शेतकरी कृषी कायद्यासोबतच, राजस्थानमधील पंचायत समितीच्या निकालावरुन स्पष्ट : जावडेकर

(farmers announced boycott on Ambani and Adani group)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.