AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JNU News : इकडे येचुरींना मुदतवाढ मिळाली अन् तिकडे हिंसा भडकली; अमित मालवीय यांनी सांगितलं JNU हिंसेचं कनेक्शन

JNU News : राम नवमीच्या दिवशी कावेरी वसतिगृहात झालेल्या हिंसेचं लोण अधिकच पसरताना दिसत आहे. रविवारी जेएनयूमध्ये (JNU Students) दोन गटात हाणामारी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. काहींना गंभीर तर काहींना किरकोळ मार लागला आहे.

JNU News : इकडे येचुरींना मुदतवाढ मिळाली अन् तिकडे हिंसा भडकली; अमित मालवीय यांनी सांगितलं JNU हिंसेचं कनेक्शन
अमित मावलीय यांनी सांगितलं JNU हिंसेचं कनेक्शनImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2022 | 1:28 PM
Share

नवी दिल्ली: राम नवमीच्या दिवशी कावेरी वसतिगृहात झालेल्या हिंसेचं लोण अधिकच पसरताना दिसत आहे. रविवारी जेएनयूमध्ये (JNU Students) दोन गटात हाणामारी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. काहींना गंभीर तर काहींना किरकोळ मार लागला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) सदस्यांनी विद्यार्थ्यांना मांसाहार भोजन करण्यास मज्जाव केला. त्यामुळे हिंसा भडकल्याचा आरोप छात्रसंघाने केला आहे. तर, रामनवमी (ram navami) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डाव्यांनी अडथळा निर्माण केला. त्यामुळे वाद झाल्याचा दावा एबीव्हीपीने केला आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मात्र, भाजपते नेते आणि आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी नवीनच दावा केला आहे. त्यांनी या घटनेचं कनेक्शन मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांच्या मुदतवाढीशी जोडलं आहे. ज्या दिवशी येचुरी यांना एक्स्टेंशन मिळालं त्याच दिवशी ही घटना घडली हा योगायोग आहे. त्याच दिवशी जेएनयूमध्ये कॉम्रेडांनी गोंधळ घातला. एबीपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. जेएनयूचा कावेरी हा त्यांचा शेवटचा गड आहे, असं मालवयी यांनी म्हटलं आहे.

येचुरी जेएनयूचे विद्यार्थी

माकपा नेते सीताराम येचुरी हे जेएनयूमध्ये शिकलेले आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात एमए केलं आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडीसाठी जेएनयूमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांचं पीएचडीचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही.

तिसऱ्यांदा महासचिव

सीताराम येचुरी यांची माकपाच्या महासचिवपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. माकपाच्या 23व्या संमेलनात पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर पुन्हा निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपवर निशाना साधला. भाजपला पराभूत करणं हेच माकपाचं लक्ष्य आहे. भाजप संघाचा हिंदुत्वावादी अजेंडा पुढे रेटत आहे. त्यामुळे आपल्याला भाजपला पराभूत करायचं आहे, असं येचुरी यांनी भाषणात म्हटलं होतं.

हवन विरुद्ध हंगामा

जेएनयूमधील हिंसेप्रकरणी दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. हवन सुरू असताना डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी अडथळा निर्माण केल्याचा दावा एबीव्हीपीने केला आहे. तर, राम नवमीच्या दिवशी नॉनव्हेज खाण्यापासून एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याचा दावा छात्रसंघाने केला आहे. हिंसेशी संबंधित कथित व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात अख्तरिस्ता अंसारी या विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचं दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ कालच्या घटनेचाच आहे की नाही याची पृष्टी होऊ शकली नाही. एबीव्हीपीनेही या घटनेशी संबंधित काही व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. जेएनयूतील एका अपंग विद्यार्थ्यालाही मारहाण करण्यात आली असून त्याचे कपडेही फाडण्यात आल्याचा दावा एबीव्हीपीने केला आहे.

संबंधित बातम्या:

JNU Violence LIVE: जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागची पाच कारणे

JNU VIDEO | Non Veg जेवणावरुन ‘जेएनयू’मध्ये राडा, दोन विद्यार्थी संघटना भिडल्या, सहा जण जखमी

VIDEO : गो तस्करांनी फिल्मी स्टाईलमध्ये चालत्या वाहनातून गायी फेकल्या, सहा जणांना अटक

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.