AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस पुन्हा तुष्टीकरण करतंय, अमित शाह यांचा हल्लाबोल; वंदे मातरमचा वाद पेटला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या वंदे मातरमच्या दोन कडव्यांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. काँग्रेस पुन्हा तुष्टीकरणाचे राजकारण करत असून हा देशविरोधी निर्णय आहे असे शाह म्हणाले. १९३७ मधील ऐतिहासिक चुकीची पुनरावृत्ती होत असून यामुळे देशाला मोठे नुकसान झाले आहे. भाजप या निर्णयाचा निषेध करत असून जनतेत जाऊन आवाज उठवेल.

काँग्रेस पुन्हा तुष्टीकरण करतंय, अमित शाह यांचा हल्लाबोल; वंदे मातरमचा वाद पेटला
amit shahImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2026 | 12:46 PM
Share

काँग्रेसने वंदे मातरमचे दोनच अंतरे गाण्याचा घेतलेला निर्णय हा देशविरोधी आहे. काँग्रेस पुन्हा एकदा तुष्टीकरणाचं राजकारण सुरू केलं आहे. त्यांच्या या निर्णयाने आधीच देशाने मोठं नुकसान सोसलं आहे. पुन्हा एकदा काँग्रेस त्या दिशेनेच देशाला घेऊन जात असून हे धोकादायक आहे. आम्ही काँग्रेसच्या या निर्णयाचा निषेध नोंदवतो, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अमित शाह यांनी मीडियाशी संवाद साधताना काँग्रेसच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला.

काँग्रेसने वंदे मातरमचे दोन छंद गाण्याचा निर्णय घेतला आहे. 1937मध्ये काँग्रेसने मुस्लिमांसाठी वंदे मातरमचे दोन तुकडे करून देशाच्या विभाजनाची पायाभरणी केली होती. तिथूनच द्विराष्ट्राच्या सिद्धांताला सुरुवात झाली. त्यानंतर देशाची फाळणी झाली. पाकिस्तानचा जन्म झाला. आज ती ऐतिहासिक चूक केली जात आहे. वंदेमातरमला दीडशे वर्षा पूर्ण होत आहेत. मोदी सरकारे बंकीमचंद्र यांच्या अमर गीताला पूर्ण गाऊन राष्ट्रीय एकात्मतेला सुदृढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी ठिकाणी पूर्ण गीत गायचा निर्णय घेतला. त्याला कायद्याचं संरक्षणही दिलं. अशावेळी काँग्रेसने हा निर्णय घेणं चुकीचं आहे, अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

जनतेत जाऊन आवाज उठवणार

काँग्रेसचा हा निर्णय केवळ आणि केवळ मुस्लिमांच्या लांगूलचालण्याच्या धोरणाचं लक्षण आहे. त्यासाठीच त्यांनी बंकीमचंद्र यांच्या अमरकृतीचाच अपमान केला नाही, तर वंदे मातरमचा नारा देत फाशीवर गेलेल्या लाखो शहीदांचाही अपमान केला आहे. आज काँग्रेस पार्टी 1937मधील त्यांच्या पक्षाचं धोरण राबवत आहे. आणि देशाचा कायदा नाकारत आहे. राहुल गांधी चांगुलचालनाचं राजकारण पुढे नेत आहेत, त्याबद्दल आश्चर्य वाटतं. मला वाटतं त्यावेळी वंदे मातरमचे दोन तुकडे करण्याची चूक झाली. आम्ही त्याचे गंभीर परिणाम भोगले आहेत. आता देशाच्या जनतेने एकजूट व्हावं आणि काँग्रेसच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे. तृष्टीकरणचं राजकारण सहन करणार नाही. हा स्वतंत्र देश आहे हे दाखवून दिलं पाहिजे, असं सांगतानाच भाजप काँग्रेसच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहे. आम्ही जनतेत जाऊन आणि विधानसभांमध्येही या विरोधात आवाज उठवणार आहोत, असं शाह म्हणाले.

संसदेत कायदा

दरम्यान, पावसाळी अधिवेशनात दीर्घ चर्चेनंतर वंदे मातरमचं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. या विधेयकानुसार वंदे मातरमचे सहाही कडवे गाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर काँग्रेसच्या म्हणण्यानुसार देशाच्या महापुरुषांनीच वंदे मातरमचे दोन कडवे स्वीकारले होते. त्यामुळे आम्हीही दोनच कडवे गाणार. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता देशात नवीन वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'