Assembly elections : तेलंगणात तिरंगी लढत, भाजप किंगमेकर ठरणार?

Telangana elections : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणूक प्रचाराासाठी पीएम मोदींची मोठी रॅली होत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही मैदानात आहेत. त्यामुळेच भाजपने आता तेलंगणातील लढत तिरंगी केली आहे.

Assembly elections : तेलंगणात तिरंगी लढत, भाजप किंगमेकर ठरणार?
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 6:59 PM

Telangana assembly election : तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपणार असून 30 नोव्हेंबरला 119 जागांसाठी मतदान होणार आहे. तेलंगणामध्ये केसीआर सत्तेची हॅट्ट्रिक साधण्यात यशस्वी होतात की राज्यात सत्ता परिवर्तन होते हे ३ डिसेंबरलाच कळणार आहे. दुसरीकडे काँग्रेस १५ वर्षांनंतर सरकारमध्ये येण्यासाठी धडपडत आहे. काँग्रेस, बीआरएस यांच्यातील लढतीत भाजप आल्याने ही लढत आता तिरंगी झाली आहे. सीएम योगी, अमित शहा आणि पंतप्रधान मोदी असे मोठे नेते तेलंगणा निवडणुकीच्या प्रचारात आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. त्यामुळे भाजपने अनेक जागांवर लढत रंजक बनवली आहे. भाजप किंग बनू शकत नाही, पण किंगमेकर बनू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

111 जागांवर भाजपचे उमेदवार

तेलंगणात भाजप पवन कल्याण यांच्या पक्षासोबत युती करुन निवडणूक लढवत आहे. राज्यातील एकूण 119 जागांपैकी 111 जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत, तर पवन कल्याणच्या जनसेना पक्षाचे उमेदवार 8 जागांवर आपले नशीब आजमावत आहेत.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एक जागा मिळाली असली तरी. टी राजा सिंह गोशामहल जागेवरून विजयी झाले होते, पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पहिल्यांदाच संजीवनी मिळाली. भाजपने 19.65 टक्के मतांसह लोकसभेच्या चार जागा काबीज केल्या होत्या. यानंतर तेलंगणात भाजपच्या आशा पल्लवित झाल्या असून यावेळी ते नव्या रणनीतीने निवडणुकीत उतरले आहेत.

ओबीसी आणि दलित व्होटबँकेवर डोळा

तेलंगणात भाजपचा डोळा ओबीसी आणि दलित व्होटबँकेवर आहे, त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मोफत योजनांसोबतच भाजपने राज्यात घराणेशाही आणि मुस्लिम आरक्षणाला निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे.

भाजपने प्रजा संग्राम यात्रेच्या माध्यमातून 1000 किलोमीटर पदयात्रा काढून केसीआर यांच्याविरोधात राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पदयात्रेदरम्यान भाजपने थेट केसीआर यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरून हल्ला चढवला. आक्रमक प्रचाराने भाजपला तेलंगणाच्या राजकारणात मुख्य शर्यतीत आणले आहे.

भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा

केसीआर यांना विरोध करण्याचा फॉर्म्युला घेऊन भाजप हिंदुत्वाचा अजेंडा ठरवत आहे. या राजकीय फॉर्म्युल्याला अनुसरून हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजप दुसरा पक्ष म्हणून पुढे आला आहे. केसीआर 2023 च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दोन विधानसभा जागांवरून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने गजवेल विधानसभा मतदारसंघातून एटाळा राजेंद्र यांच्यासारख्या तगड्या नेत्याला उमेदवारी दिली आहे.

केसीआर यांना थेट आव्हान देत भाजपने काँग्रेसलाही आपला दृष्टिकोन दाखवून दिला आहे. याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना स्वत: केसीआर यांचा दुसरा मतदारसंघ असलेल्या कामरेड्डीमधून निवडणूक लढवावी लागली.

भाजपचे तेलंगणात चार खासदार

तेलंगणाच्या राजकारणात भाजपच्या चारपैकी तीन खासदार उत्तर तेलंगणातून येतात. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत पक्षाने या तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे. हैदराबादशिवाय निर्मल, आदिलाबाद, करीमनगर, हुजूराबाद आणि निजामाबाद या भागात भाजप जोरदारपणे निवडणुकीच्या रिंगणात आहे. या भागांतील जागांवर भाजप किंगमेकरची भूमिका बजावत असल्याचे मानले जात आहे.

तेलंगणात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू नये यासाठी भाजप प्रयत्नशील आहे आणि त्या स्थितीत सरकार स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. यामुळेच अखेर भाजपने आपल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रचारात उतरवले असून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत पंतप्रधान मोदी तळ ठोकणार आहेत. यावेळी, पंतप्रधान तिरुपती बालाजींच्या दरबारात नतमस्तक होऊन आणि हैदराबादमध्ये रोड शो करून राजकीय अजेंडा निश्चित करण्याची रणनीती आहे.

उत्तर तेलंगणातील अनेक भागात भाजप मजबूत

उत्तर तेलंगणा विभागातील अनेक शहरी मतदारसंघात भाजप मजबूत स्थितीत आहे आणि BRS आणि काँग्रेस उमेदवारांच्या विजय किंवा पराभवावर प्रभाव टाकू शकतो. किमान 20 भागात भाजपची काँग्रेस आणि बीआरएसशी थेट स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या जागांवर तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.