AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणं बंद करावं; महागाई कमी होईल,भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेसला मतदान करणारे आणि काँग्रेसी व्यक्तींनी अन्न त्याग करावं, पेट्रोलचा वापर बंद करावा, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं आहे. BJP Brijmohan Agrawal congress

काँग्रेसच्या मतदारांनी अन्नत्याग करावा, पेट्रोल वापरणं बंद करावं; महागाई कमी होईल,भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
ब्रीजमोहन अग्रवाल
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 11:44 AM
Share

रायपूर: पेट्रोलच्या दरानं शंभरी केव्हाच ओलांडली असून डिझेल देखील नवद्द रुपयांच्यावर गेलं आहे. खाद्यतेलांच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहेत. महागाई आणि कोरोनाचं संकट वाढलं असताना राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. छत्तीसगडमध्ये तीन वेळा मंत्रिपद भूषवलेल्या वरिष्ठ भाजप नेत्यानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ब्रीजमोहन अग्रवाल या भाजप नेत्यानं ” जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेसी व्यक्तींनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल”असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. (BJP leader Brijmohan Agrawal said congress party members and voters leave food for decrease of inflation)

काँग्रेस आक्रमक

छत्तीसगडमधील भाजप सरकारच्या काळाता तीन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले भाजप आमदार ब्रीजमोहन अग्रवाल यांनी महागाईवरुन काँग्रेसवर निशाणा साधला. ” जर काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांनी आणि काँग्रेसी व्यक्तींनी खाणे पिणे सोडले तर महागाई कमी होईल” असं ते म्हणाले. अग्रवाल यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी अग्रवाल यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

महागाई राष्ट्रीय आपत्ती:काँग्रेस

काँग्रेस अध्यक्ष मोहन मरकाम यांनी महागाईच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला. मोहन मरकाम यांनी महागाई ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं. गेल्या 7 वर्षात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महागाईमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं लोकांचं उत्पन्न घटलं आहे. कोरोना लॉकडाऊनमुळं लोकांसमोरील अडचणी वाढल्या असताना महागाई देखील वाढली आहे. भारतातील वाढत्या महागाईला मोहन मरकाम यांनी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची धोरण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

भाजपकडून पलटवार

कांग्रेस प्रदेश अध्यक्ष मोहन मरकाम यांनी महागाईला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. ब्रीजमोहन अग्रवाल यांनी वेळी महागाई जर राष्ट्रीय आपत्ती असेल असं ज्या लोकांना वाटत असेल त्यांनी खाणे पिणे सोडलं पाहिजे, असं वक्तव्य केलं. काँग्रेसला मतदान करणारे आणि काँग्रेसी व्यक्तींनी अन्न त्याग करावं, पेट्रोलचा वापर बंद करावा. काँग्रेसी आणि काँग्रेसच्या मतदारांनी असं केल्यास महागाई काही प्रमाणात कमी होईल, असं अग्रवाल म्हणाले.त्यांच्याया वक्तव्यानंतर छत्तीसगडचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

हेही वाचा:

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री; अनलॉकच्या गोंधळावरून फडणवीसांचा टोला

त्या प्रीवेडिंगवाल्यांना कशाला अडवताय, ते हनिमूनालाही इथेच आले पाहिजेत, अजितदादांचा प्रेमळ दम

(BJP leader Brijmohan Agrawal said congress party members and voters leave food for decrease of inflation)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.