AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G-20 परिषदेत चीन बनला ‘स्पॉयलर’, अमेरिकेने सुनावलं तर भारताचा ही स्वॅग भारी

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी G-20 परिषदेसाठी भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संबंध भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाशी जोडला जात आहे.

G-20 परिषदेत चीन बनला 'स्पॉयलर', अमेरिकेने सुनावलं तर भारताचा ही स्वॅग भारी
| Updated on: Sep 06, 2023 | 11:48 PM
Share

G20 Summit : नवी दिल्ली येथे होणाऱ्या G-20 शिखर परिषदेसाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. राजधानी दिल्ली पूर्णपणे उजळून निघाली आहे. कारण अनेक देशांचे नेते आणि अधिकारी येथे पोहोचत आहेत. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीपूर्वी जर कोणाची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती चीनची अनुपस्थिती आहे. भारतापासून अमेरिकेपर्यंत आणि इतर देशांनीही यावर भाष्य केले आहे. अमेरिकेने तर चीनला स्वतःला स्पॉयलर म्हणून दाखवायचे असेल, तर ती त्याची निवड आहे, असे म्हटले आहे. जाणून घ्या चीन आणि G-20 शिखर परिषदेबाबत काय गोंधळ सुरू आहे आणि कोण काय बोलले.

भारतात होणाऱ्या G-20 परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येणार नाहीत, त्यांच्या जागी चीनचे पंतप्रधान ली कियांग सहभागी होणार आहेत. G-20 शिखर परिषदेपूर्वी चीनने एक वादग्रस्त नकाशा जारी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये त्याने अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशला आपला भाग म्हणून घोषित केले होते. याआधीच लडाख वादापासून दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

अमेरिका काय म्हणाला?

जी-20 बैठकीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी नवी दिल्लीत पोहोचतील.  जिथे त्यांना पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चाही करायची आहे. व्हाईट हाऊसने चीनच्या संदर्भात एक विधान जारी केले आहे की, जर त्याला या G-20 शिखर परिषदेचे स्पॉयलर बनायचे असेल तर ते तसे करू शकते. अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागाराने सांगितले की, भारत आणि चीनमधील सीमा विवादाचा जी-20 वर परिणाम होऊ नये, जर चीनला बिघडवायचे असेल तर ती त्याची निवड आहे. आम्हाला वाटते की भारत सर्व सदस्यांना येण्यास सांगत आहे, सर्वांनीही यात सहकार्य करावे.

चीनवर भारत काय म्हणाला?

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येत नसल्याबद्दल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही निवेदन दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, असे अनेक प्रसंग आहेत जिथे राज्याचे प्रमुख G-20 बैठकीला जात नाहीत, परंतु त्यांचा प्रतिनिधी येथे असतो. मुख्य म्हणजे या बैठकीत त्यांचा अजेंडा काय आहे आणि ते काय भूमिका घेत आहेत. एस. जयशंकर म्हणाले की जी-20 बैठकीत येणारा प्रत्येक देश मनापासून येत आहे आणि प्रत्येकजण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. G-20 बैठकीचा अजेंडा आधीच ठरलेला आहे, हे मंथन सातत्याने सुरू असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जी-20 परिषदेसाठी भारत सज्ज आहे

भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषद होत आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे ही बैठक होणार आहे. या सभेसाठी दिल्ली सजली आहे, अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले असून शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी वेगवेगळ्या भागात लावलेले निर्बंध, मार्गातील बदल याचीही माहिती दिली आहे. सुमारे दोन डझन देशांचे प्रमुख या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचत आहेत, 7 तारखेपासून सर्वांचे येणे सुरू होईल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.