AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाराज कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर, दिल्लीत नड्डा, शहांना भेटण्याची शक्यता, पंजाब काँग्रेसला मोठा झटका लागणार?

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (captain amrinder singh) भाजपमध्ये जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आज अमरिंदर सिंह नवी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

नाराज कॅप्टन अमरिंदर सिंह भाजपच्या वाटेवर, दिल्लीत नड्डा, शहांना भेटण्याची शक्यता, पंजाब काँग्रेसला मोठा झटका लागणार?
कॅप्टन अमरिंदर सिंह हे नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली: पंजाबमध्ये (Punjab) राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (captain amrinder singh) भाजपमध्ये जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आज अमरिंदर सिंह नवी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांची दिल्लीत भेट घेतील. ( Congress leader and former Punjab Chief Minister Capt Amarinder Singh is likely to join the BJP. Talks that Amarinder Singh will meet JP Nadda and Amit Shah in Delhi )

अमरिंदर सिंह यांच्या सल्लागारांनी शक्यता नाकारली!

असं असलं तरी, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या माध्यम सल्लागार रवीन ठकुराल यांनी या सगळ्या शक्यता नाकारल्या आहेत, ते म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दल अनेक बातम्या येत आहे, मात्र ते दिल्लीच्या वैयक्तिक दौऱ्यावर आहेत, तिथं ते त्यांच्या काही मित्रांना भेटणार आहेत आणि नवीन मुख्यमंत्र्यांसाठीचं कपूरथलाचं घरही ते रिकामं करणार आहेत. त्यामुळे अशा शक्यता वर्तवणं चुकीचं आहे.

 

दरम्यान, पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादाला कंटाळून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांच्यासोबत त्याचे वाद असल्याचं बोललं जातं. त्यानंतर काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्याजागी चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचा नवा मुख्यमंत्री बनवलं. त्यामुळेच आता शक्यता वर्तवली जात आहे की, काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या वादाला कंटाळून कॅप्टन अमरिंदर सिंह पक्ष सदस्य पदाचाही राजीनामा देऊ शकतात.

कॅप्टन अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये निराश

आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोशल मीडियावर आपला म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले होते की, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा त्यांच्या मुलांप्रमाणे आहेत, मात्र पंजाबसाठी त्यांचं जे धोरण राहिलं आहेत, त्यातून त्यांच्यात अनुभवाची कमी साफ दिसते. हेच नाही तर त्यांनी पक्षात आपल्याला अमानित झाल्यासारखं वाटतं असंही ते म्हणाले होते. त्याच्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

काँग्रेस प्रवक्त्यांनी दिलं होतं उत्तर

अमरिंदर सिंह यांच्या वक्तव्यानंतर, काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी त्याल उत्तर दिलं होतं. त्या म्हणाला, अमरिंदर सिंह यांचं वक्तव्य त्यांच्या पदाला शोभत नाही, मात्र ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळेच शक्यता आहे की त्यांनी हे वक्तव्य रागात केलेलं असावं. पुढे त्या म्हणाल्या, ” ते माझ्या वडिलांच्या वयाचे असतील, वृद्ध लोकांना राग लवकर येतो आणि जास्त प्रमाणात असतो. रागात ते खूपकाही बोलून जातात, त्यांचा राग, त्यांचं वय, त्यांच्या अनुभवाचा आम्ही आदर करतो, मला वाटतं की ते याबद्दल नक्की परत विचार करतील”

हेही वाचा:

नवज्योतसिंग सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात; सिद्धूंचा पुढचा प्लॅन काय?

फडणवीसांना फक्त उद्धव ठाकरेंचीच नाही तर ममतांचीही टक्कर, गोव्यात काँग्रेसचं मोठं नुकसान, माजी मुख्यमंत्र्यानं पक्ष सोडला

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.