Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नी सोडून गेली, एअरफोर्सची नोकरी सोडली, साधू बनला; 15 वर्षानंतर एक दिवस अचानक…

काळीज पिळवटून टाकणारी एक अनोखी प्रेम कहाणी समोर आली आहे. तब्बल 15 वर्षापासून दूर राहिल्यानंतर दाम्पत्याने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या इच्छेखातर दोघांनीही पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्नी सोडून गेली, एअरफोर्सची नोकरी सोडली, साधू बनला; 15 वर्षानंतर एक दिवस अचानक...
CoupleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 1:38 PM

पाटणा : बिहारच्या मोतीहारीमध्ये एका दाम्पत्याची जगावेगळी प्रेमकहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 15 वर्षापूर्वी नवरा आणि बायकोत वाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतिया येथील आईवडिलांच्या घरी आली आणि तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पत्नी कायमची माहेरी निघून गेल्याने तो कोलमडला. त्यामुळे त्याने एअरफोर्सची नोकरी सोडली. साधू बनला. वणवण भटकला अन् पूजा पाठ करू लागला.

दोघा नवरा बायकोंनी कायमस्वरुपी वेगळं राहायचं ठरवलं. पण 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम तसूभर कमी झालं नाही. या काळात त्याच्या पत्नीच्या आयुष्यात कोणी आलं नाही अन् साधू बनलेल्या पतीनेही आपल्या आयुष्यात कुणालाही स्थान दिलं नाही. या काळात त्यांचा एक मुलगाही मोठा झाला. तो वारंवार आईला वडिलांबाबत विचारत होता. त्यामुळे पत्नीने नवऱ्याला भेटायचं ठरवलं. दोघेही एकांतात भेटले. एकमेकांबद्दलचे रुसवे फुगवे दूर केले अन् तब्बल15 वर्षानंतर पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

फक्त दोन वर्ष नांदले

ही गोष्ट आहे प्रभाकर कुमासेर पांडेय यांची. प्रभाकर हे गोविंदगज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जितवारपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा विवाह पिपरकोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगरी गावच्या संदीप देवीशी झाला होता. लग्नानंतर दोघेही दोन वर्ष एकत्र नांदले. त्यावेळी प्रभाकर एअरफोर्समध्ये उच्चपदावर कार्यरत होता. मात्र, या दोघांच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यातील वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

प्रकरण कोर्टात

त्यानंतर दोघांनीही कोर्टात धाव घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. दोन्हीकडच्या कुटुंबीयांनी या दोघांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण काहीच जमलं नाही. शेवटी पत्नी सोबत राहत नाही म्हणून कोलमडून पडलेल्या प्रभाकर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सुखाच्या शोधासाठी तो साधू बनला. साधू बनून गावोगावी भटकला. जंगलात रानावनात राहिला. मिळेल ते खाल्लं. जिथे जागा दिसेल तिथे झोपला. ऊन वारा पाऊस याची काहीच तमा बाळगली नाही. अनेक मंदिरात दिवस दिवस रात्र रात्र बसून ध्यान धारणा केली. पूजा पाठ केला. दाढी वाढली.

मुलामुळे सर्व आई वडील एकत्र

तब्बल 15 वर्ष त्यांची ही वणवण सुरू होती. तिकडे त्यांचा मुलगा मोठा होत होता. मुलाला जसजस कळू लागलं तसतसा तो आईला वडिलांबाबत विचारू लागला. वडिलांना भेटायचा तगादा लावू लागला. त्यामुळे संदीपदेवीचंही काळीज पाघळलं. तिने नवऱ्याची भेट घेतली. सर्व काही विसरून मुलासाठी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याची विनंती केली. प्रभाकरही तयार झाला अन् 15 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.