AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, शशी थरुर म्हणाले, Thank You!

काँग्रेस खासदार शशी थरुर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली कोर्टाने थरुर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय, शशी थरुर म्हणाले, Thank You!
Shashi Tharoor
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 11:31 AM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरुर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली कोर्टाने थरुर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. शशी थरुर यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. गेल्या साडेसात वर्षापासून मी या त्रासातून जात आहे. मला दोषमुक्त केल्यामुळे मी आपला आभारी आहे, असं शशी थरुर यांनी कोर्टाला सांगितलं.

माजी भारतीय डिप्लोमॅट आणि काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्या पत्नी- प्रसिद्ध उद्योजिका सुनंदा पुष्कर (Sunanda Pushkar) यांचा मृत्यू 17 जानेवारी 2014 रोजी झाला होता. दिल्लीच्या लीला पॅलेसमधील हॉटेल रुममध्ये त्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. आपली पत्नी झोपली असावी, असा समज करुन शशी थरुर यांनी दुर्लक्ष केले. मात्र बराच वेळ त्यांना जाग आली नाही, तेव्हा त्यांना आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचं समजल्याचा दावा केला जातो.

सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली, की घातपात हा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास केला. सुनंदा पुष्कर यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख होता. मात्र ड्रग्ज ओव्हरडोसनंतर पुष्कर यांचा मृत्यू झाला असला, तरी त्यांच्या शरीरावर जखमा असल्याचं एम्सच्या डॉक्टरांनी म्हटलं होतं.

कोण होत्या सुनंदा पुष्कर?

सुनंदा पुष्कर यांचा जन्म 27 जून 1964 रोजी काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. लेफ्टनंट कर्नल पुष्कर नाथ दास आणि जया दास यांच्या त्या कन्या. हॉटेल मॅनेजमेंट केलेला मित्र संजय रैनासोबत त्यांचा विवाह झाला होता. मात्र 1988 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पुढच्याच वर्षी त्या दुबईला गेल्या. 1991 मध्ये त्यांनी सुजित मेनन यांच्याशी लग्न केलं. नोव्हेंबर 1992 मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मात्र 1997 मध्ये मेनन यांचा अपघाती मृत्यू झाला.

शशी थरुर यांच्याशी तिसरा विवाह

दुसरीकडे, शशी थरुरही 2007 मध्ये कॅनडियन बायको ख्रिस्ता गिल्ससोबत दुबईला आले होते. ऑक्टोबर 2009 मध्ये सुनंदा आणि शशी यांची एका पार्टीत ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2010 मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले. दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर होतं. थरुर यांच्या केरळातील गावी मल्ल्याळी पद्धतीने ते लग्नबद्ध झाले. हा दोघांचाही तिसरा विवाह होता. त्याच वर्षी शशी थरुर संसदेवर निवडून गेले.

संबंधित बातम्या   

Sunanda Pushkar | थरुर, तरार आणि थरार! पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत ट्विटरवॉरच्या दुसऱ्याच दिवशी झालेला सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू 

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.