AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लॅटमध्ये 87.9 किलो सोने, 11 लग्झरी घड्याळे, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, खजान्याचा मालक कोण?

तपास संस्थांची टीम त्या फ्लॅटवर छापेमारीसाठी गेली तेव्हा कुलूप लावण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शाह यांच्या एका नातेवाईकांकडून चावी घेतली. त्या नातेवाईकांचीही चौकशी डीआरआयचे अधिकारी करीत आहेत.

फ्लॅटमध्ये 87.9 किलो सोने, 11 लग्झरी घड्याळे, रोकड मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, खजान्याचा मालक कोण?
गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने जप्त करण्यात आले.Image Credit source: PTI
| Updated on: Mar 19, 2025 | 3:28 PM
Share

गुजरातमधील अहमदाबादमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (ATS) यांच्या संयुक्त कारवाईत मोठे यश मिळाले आहे. एका फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने मिळाले आहे. 87.9 किलो सोने, 11 लग्झरी घड्याळे आणि मोठ्या प्रमाणावर रोकड मिळाली आहे. ही रोकड मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली आहे. विदेशातून तस्करी करुन हे सोने आणल्याचा संशय आहे. या प्रकरणात सर्व बाजूंनी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

रोकड मोजण्यासाठी मागवले मशीन

अहमदाबादमधील एका अपार्टमेंटमधून 100 कोटी रुपये किंमतीचे 87.92 किलो सोने मिळाले. या छापेमारीत लग्झरी घड्याळे, रोकड रक्कम जप्त करण्यात आली आहे. 19.6 किलो सोन्याची ज्वेलरी, कोट्यवधी रुपये किंमतीच्या 11 महाग घड्याळी आणि 1.37 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. रोकड मोजण्यासाठी डीआरआयला नोटा मोजण्याची मशीन मागवावी लागली.

तपास संस्थांना मिळालेल्या गुप्त सूचनेनंतर अधिकाऱ्यांनी अहमदाबादमधील पालडी भागात असलेल्या एका फ्लॅटवर छापा टाकला. त्या छाप्यात 87.92 किलो सोने मिळाले. त्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. त्यातील बहुतांश सोन्यावर विदेशी चिन्ह आहे. हे सोने भारतात तस्कारी करुन आणले गेले.

ही संपत्ती आहे तरी कोणाची?

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, छापा टाकण्यात आलेले अहमदाबाद अपार्टमेंटमधील फ्लॅट मेघ शाह यांनी भाड्याने घेतला होता. तेच या खजिन्याचा संभाव्य मालक असू शकतात. त्यांचे वडील महेंद्र शाह दुबईत असतात. ते शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या दोघांनी आर्थिक व्यवहार शेल कंपन्यांच्या माध्यमातून केला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक (एटीएस) सुनील जोशी यांनी सांगितले की, पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

नातेवाईकांकडून घेतली चावी

तपास संस्थांची टीम त्या फ्लॅटवर छापेमारीसाठी गेली तेव्हा कुलूप लावण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शाह यांच्या एका नातेवाईकांकडून चावी घेतली. त्या नातेवाईकांचीही चौकशी डीआरआयचे अधिकारी करीत आहेत. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय तस्करीचे आहे का? त्याचाही तपास करण्यात येणार आहे.

महेंद्र शाह हे गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मूळचे रहिवाशी आहेत. मात्र अनेक वर्षांपासून ते मुंबईत स्थायिक आहे. त्याचा व्यवसाय दुबईपर्यंत विस्तारला आहे. ते दुबईला येत-जात राहतात. छापेमारीनंतर गुजरात एटीएसने संपूर्ण प्रकरण डीआरआयकडे सोपवले असून पुढील कारवाई डीआरआय करणार आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.