AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS: शाळा, कॉलेजांत आता हिंदुत्वाचे धडे?, रायपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत काय ठरलं?

भारताची घोषणा हिंदू राष्ट्र अशी होणार का, या प्रश्नाचे उत्तरही मनमोहन वैद्य यांनी दिले. त्यांनी सांगितले की राष्ट्र याचा अर्थ समाज असा असतो. तर इथला समाज हा हिंदूच असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकतेत एकता पाहणे हाच भारताचा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माचा अर्थ त्यामुळे इथे रिलिजन असा होत नसल्याचे वैद्य म्हणाले.

RSS: शाळा, कॉलेजांत आता हिंदुत्वाचे धडे?, रायपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत काय ठरलं?
संघाची दिशा काय?Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 7:53 PM
Share

रायपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)अखिल भारतीय समन्वयाच्या बैठकीत, सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagvat)यांनी देशातील संघ परिवारातील महत्त्वाच्या संघटनांशी चर्चा केली. येत्या काळात देशात काही सकारात्मक बदलांवर काम होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. यात देशातील शाळा आणि कॉलेजांत हिंदुत्वाचा कोर्स (hindutva course)शिकवण्यात यावा, या बाबीचाही समावेश आहे.

बैठकीनंतर संघाचे सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितले आहे की, या बैठकीत हे ठरवण्यात आले आहे की, देशाच्या विद्यापीठांत हिंदुत्वाचे शिक्षण द्यायला हवे. जर अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण घेता येत असेल तर आपल्या देशातही हे शिक्षण घेता यायला हवे, असे वैद्य म्हणाले. यासह जीडीपीच्या ऐवजी भारतीय मानक इंडेक्स तयार करण्याचाबाबतही या बैठकीत विचार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हिंदू राष्ट्राबाबतही केले भाष्य

भारताची घोषणा हिंदू राष्ट्र अशी होणार का, या प्रश्नाचे उत्तरही मनमोहन वैद्य यांनी दिले. त्यांनी सांगितले की राष्ट्र याचा अर्थ समाज असा असतो. तर इथला समाज हा हिंदूच असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकतेत एकता पाहणे हाच भारताचा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. धर्माचा अर्थ त्यामुळे इथे रिलिजन असा होत नसल्याचे वैद्य म्हणाले. देशात विविधतेत भेद मानण्यात येत नाही. परकीयांना शत्रू समजत नाही. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. देशात हिंदू-मुसमानांचत वाद होतल, पण ते मरणार नाहीत. सामंजस्यता निर्माण होईल, तेच हिंदुत्व असेल. त्याची घोषणा करण्याची गरज नाही, ते हिंदू राष्ट्र आहेच.

काँग्रेसवरही केली टीका

या बैठकीत सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा आणि सोशल मीडियावर संघाच्या विरोधात टा नेते, कण्यात आलेल्या एका पोस्टवरही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांच्या बापजाद्यांनी नेहमीचा संघाचा तिरस्कार केला आहे. मात्र तरीही संघ वाढत राहिला. संघ का काढला, कारण राष्ट्रासाठी सत्याच्या सिद्धांतावर संघ काम करीत राहिला.

देशातील 36 संघटनांचा सहभाग

तीन दिवस रायपुरात संघाची समन्वयाची बैठक पार पडली. यात संघ विचारांवर चालणाऱ्या 36 संघटनांचे 250 प्रमुख व्यक्ती, पदाधिकारी उपस्थित होते. यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही उपस्थित होते. तीन दिस चाललेल्या या बैठकीनंतर सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी या बैठकीबाबत माहिती दिली.

आगामी काळात ही असणार संघाची दिशा

  1. स्थानिक वस्तूंना मागणी, प्रसिद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, ब्रँडेच वस्तुंमुळे स्थानिक कामागारांच्या उत्पादानाचे नुकसान होते आहे.
  2. जीडीपीच्या एवजी भारतीय मानक इंडेक्स तयार करण्यावर विचार
  3. ऑग्रेनिक फार्मिंग, शेतकरी, मजूर, व्यापारी यांना एकत्र नेण्याचा प्रयत्न करणार. शेती करणाऱ्यांचे शिक्षण नसते, पदवीधर शेती करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर काम करणार
  4. भारतीय न्यायालयात भारतीय भाषांतून कामकाज व्हावे यासाठी आग्रही राहणार. न्यायाधीश आणि वकील काय बोलतात, हे बऱ्याचदा कळत नाही
  5. आदिवासी जनजातींचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करणार
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.