AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारीख ठरली! आता मुंबईत मोठ्या हालचालींचे संकेत, भाजपचं टेन्शन वाढणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विरोधी पक्षांच्या गोटात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईत सर्वाधिक घडामोडी घडणार आहेत.

तारीख ठरली! आता मुंबईत मोठ्या हालचालींचे संकेत, भाजपचं टेन्शन वाढणार?
| Updated on: Aug 04, 2023 | 9:40 PM
Share

नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना पक्षफुटीला आता एक वर्ष झालंय. त्यानंतर गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. तसेच महाराष्ट्र काँग्रेस पक्षातही फूट पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. पण काँग्रेस नेत्यांनी संबंधित चर्चांचं खंडन केलं आहे. आम्ही एकसंघ आहोत, असं महाराष्ट्रातील काँग्रेस नेते म्हणत आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर आता विरोधक सतर्क झाले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहेत. विरोधी पक्षांची नुकतीच काही दिवसांपूर्वी बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचं इंडिया असं नाव ठेवण्यात आलं. त्यानंतर इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबईत होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण ही बैठक मुंबईत नेमकी कधी होईल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. विशेष म्हणजे या दरम्यानच्या काळात मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर आता इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

मुंबईत दोन दिवस बैठक होणार

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला ही बैठक होणार आहे. मुंबईच्या पवईमधील हॉटेल WEST END येथे बैठक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 25 आणि 26 सप्टेंबरला बैठक घेण्याचं ठरलं होतं. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वेळ नसल्याने पुढील तारीख ठरली. महाविकास आघाडीकडे या बैठकीचं संयोजक पद आहे.

भाजपचं टेन्शन वाढणार?

इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीमुळे भाजपचं देखील टेन्शन वाढू शकतं. कारण आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी प्रभावी अशी रणनीती ठरवली तर त्याचा भाजपला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे या बैठकीकडे भाजपचं देखील लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांच्या गोटात हालचाली सुरु झाल्यानंतर सत्ताधारी पक्षही सतर्क झाले आहेत. सत्ताधारी आमदारांची देखील मुंबईत लवकरच बैठक पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकांमध्ये कोण काय ठरवतं ते आगामी काळात विविध घडामोडींमधून स्पष्ट होईल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.