Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

मनोहर लाल खट्टर कार्यक्रम स्थळी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत भाजप सरकारचा विरोध केला (Police Lathi charge on haryana karnal farmers)

कृषी कायद्याविरोधात हरियाणात राडा, मुख्यमंत्री येण्याआधीच स्टेजची तोडफोड, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 4:33 PM

चंदीगड : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण येताना दिसत आहे. कारण हरियाणात भाजपच्या किसान संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर कार्यक्रम स्थळी येण्याआधी स्टेजची तसेच खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. हा राडा इतका वाढला की, अखेर पोलिसांना शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला (Police Lathi charge on haryana karnal farmers).

हरियाणाच्या करनाल येथील कैमला गावात आज (10 जानेवारी) भाजपकडून किसान संवाद कार्यकर्माचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे शेतकऱ्यांना संबोधित करणार होते. केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायद्यांचा किती फायदा आहे, याबाबत ते शेतकऱ्यांना माहिती देणार होते. मात्र, खट्टर कार्यक्रम स्थळी दाखल होण्याआधीच शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत भाजप सरकारचा विरोध केला. त्यांनी खट्टर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

या दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. गर्दी पांगावी यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांवर जलफवारे देखील केले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखेर खट्टर यांचा दौरा रद्द करण्यात आला.

काँग्रेसचा खट्टर सरकारवर निशाणा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खट्टर यांच्यावर टीका केली. “खट्टर सरकारने शेतकऱ्यांच्या महापंचायतीचं ढोंग करणं बंद करावं. अन्नदाताच्या भावनांशी खेळून कायदा बिघडण्याचा प्रयत्न बंद करा. संवाद करायचाच असेल तर गेल्या 46 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या अन्नदात्यांशी करा”, असं सुरजेवाला यांनी सुनावलं (Police Lathi charge on haryana karnal farmers).

हेही वाचा : Special story | ‘बचेंगे तो और भी लढेंगे’, पानिपतची लढाई ते शेतकरी आंदोलन, बुराडीचा रक्तरंजित आणि धगधगता इतिहास

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.