AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुडकुडणाऱ्या थंडीत आमचे जवान तैनात, त्यांना सरकार पैसेही देत नाही, ही कोणती देशभक्ती? : राहुल गांधी

केंद्र सरकार भारतीय संरक्षण दलाला पुरेसे पैसे देत नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे (Rahul Gandhi slams Modi Government).

कुडकुडणाऱ्या थंडीत आमचे जवान तैनात, त्यांना सरकार पैसेही देत नाही, ही कोणती देशभक्ती? : राहुल गांधी
| Updated on: Feb 03, 2021 | 4:10 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकार भारतीय संरक्षण दलाला पुरेसे पैसे देत नाही, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात भारताच्या संरक्षण दलांसाठी पुरेशा निधींची तरतूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील 99 टक्के जनतेच्या हिताचा नाही तर फक्त एक टक्के नागरिक असलेल्या दहा ते पंधरा उद्योगपतींसाठी तयार करण्यात आला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर “थंडीत आमचे सैनिक तैनात आहेत आणि तुम्ही त्यांना पैसे देत नाहीत. हा कोणता राष्ट्रवाद आहे? ही कोणती राष्ट्रभक्ती आहे?” असे सवाल त्यांनी केले आहेत (Rahul Gandhi slams Modi Government).

“केंद्र सरकार देशातील 99 टक्के नागरिकांना पाठिंबा देईल. अर्थसंकल्पात या 99 टक्के शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदी करण्यात येतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी माझी अपेक्षा होती. मात्र, हा अर्थसंकल्प देशातील फक्त 1 टक्के नागरिकांसाठी आहे. हा अर्थसंकल्प फक्त श्रीमंत लोक, उद्योजकांचा आहे. कामगार, शेतकरी, मजूर, संरक्षण खातं यांच्याकडूल सर्व पैसे खेचून त्याच दहा-पंधरा लोकांचा खिशात टाकले गेले आहेत. खासगीकरणाचा फायदा त्यांनाच मिळेल”, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

“सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीन भारतात शिरकार करतो. भारताची हजारो किमीच्या जमिनीवर ताबा मिळवतो. पण तुम्ही चीनला बजेटमधून संदेश देतात की, संरक्षणासाठी जास्त पैशांची तरतूद करणार नाहीत. तीन-चार हजार कोटी रुपये तुम्ही वाढवले. तुम्ही चीनला नेमका संदेश काय दिला? तुम्ही आतमध्ये येऊ शकता. तुम्हाला जे कारयचंय ते करा. आम्ही आमच्या सेनेला पाठिंबा देणार नाहीत”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आमचे जे जवान लडाखमध्ये आहेत, आमच्या वायूदलाचे पायलट जिथे आहेत, त्यांना आज काय वाटत असेल? आमच्यासमोर एवढे मोठे आव्हानं आहेत. पण आमचे सरकार सैन्यदालाला पैसे देत नाही. याशिवाय जे आमच्या दलाचे हक्काचे पैसे आहेत ते पैसे फक्त मोजक्या एक टक्क्याच्या उद्योगपती लोकांना दिले जात आहेत. यातून देशाला काही फायदा होणार नाही. जे आमच्या सैन्याला पाहिजे ते सरकारने दिलं पाहिजे”, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

“सरकारने छोट्या उद्योगधंद्यांना प्रोत्सान दिलं असतं तर अर्थव्यवस्था सुरळीत सुरु होऊ शकली असती. ते फक्त एक टक्के लोकांना पैसे देत आहेत”, असा आरोप त्यांनी केला (Rahul Gandhi slams Modi Government).

‘हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही’

“सरकार किल्लाबंदी का करत आहे? ते शेतकऱ्यांना घाबरत आहेत का? शेतकरी शत्रू आहे का? शेतकरी देशाची शक्ती आहे. त्यांना दाबायचं, मारायचं आणि धमकी द्यायचं हे सरकारचं काम नाही. सरकारचं काम शेतकऱ्यांशी बातचित करणं आणि समस्या सोडवण्याचं आहे. हे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या हिताचं नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा : जगातील हुकूमशहांची नावं ‘M’वरूनच का सुरू होतात?; राहुल गांधींची खोचक टीका

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.