AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Violence in Delhi : दिल्ली हिंसेचा तपास करण्यासाठी दहा पथकं तैनात, दंगल आणि हत्येचे गुन्हे दाखल

दिल्लीत हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) शोभा यात्रेवळी झालेल्या हिंसेचा तपास दिल्ली पोलिसांचा ( Delhi Police ) क्राईम ब्रँच स्पेशल सेल टीम करत आहे. या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी दहा पथकं स्थापन केली आहेत.

Violence in Delhi : दिल्ली हिंसेचा तपास करण्यासाठी दहा पथकं तैनात, दंगल आणि हत्येचे गुन्हे दाखल
दिल्ली हिंसेचा तपास करण्यासाठी दहा पथकं तैनात,Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2022 | 7:39 AM
Share

नवी दिल्ली: दिल्लीत हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) शोभा यात्रेवळी झालेल्या हिंसेचा तपास दिल्ली पोलिसांचा (Delhi Police) क्राईम ब्रँच स्पेशल सेल टीम करत आहे. या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी दहा पथकं स्थापन केली आहेत. या हल्ल्यात आतापर्तयंत सहा पोलीस जखमी झाले आहेत. यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला गोळी लागली आहे. तसेच या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या आणि दंगलीचे गुन्हे दाखल करून पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू केली आहे. ज्या दिल्लीच्या जहांगीरपुरी (Riots in Jahangirpuri) भागात हा राडा झाला, त्या ठिकाणी आरएएफची दोन पथकं तैनात करण्यात आली आहेत. या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दिल्लीतील हिंसेनंतर यूपी पोलिसांना अॅलर्ट करण्यात आलं आहे. हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेवर जहांगीरपुरीत दगडफेक झाली होती. त्यात पोलीसही जखमी झाले होते. त्यामुळे दिल्लीलाच लागून असलेल्या यूपी पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्लीतील हिंसेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी चर्चा केली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याचे आदेश शहा यांनी दिले. अज्ञात लोकांनी दगडफेक केली आणि काही वाहनांना आग लावली, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जहांगीरपुरीसह अन्य संवेदनशील परिसरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दंगलखोरांविरोधाक कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचं दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितलं.

अफवांवर लक्ष देऊ नका

अस्थाना यांनी ट्विट करून वरिष्ठ पोलिसांना काही सूचना दिल्या आहे. वरिष्ठ पोलिसांनी संबंधित परिसरात राहावं. कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईनं लक्ष ठेवावं. दंगल झालेल्या परिसरात गस्ती वाढवा. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर लक्ष देऊ नये, असं आवाहनही अस्थाना यांनी केलं आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या मते, ही पारंपारिक शोभा यात्रा होती. या मिरवणुकीवेळी पोलीस तैनात होते. कुशल सिनेमाजवळ मिरवणूक येताच दोन समुदायामध्ये वाद आणि हाणामारी सुरू झाली. यावेळी दगडफेक झाली. ही हिंसा रोखत असताना काही पोलीस जखमी झाले, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असंही म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

Hanuman Jayanti Delhi : हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवेळी दिल्लीत मोठा राडा, अनेक गाड्यांची तोडफोड, पोलीसही जखमी

Violence in Delhi : हनुमान जयंतीदिनी दिल्लीत हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक आणि तुफान राडा; केजरीवालांचं शांततेचं आवाहन

काँग्रेसचे मिशन 2024… सोनियांचे बड्या नेत्यांसोबत विचारमंथन, प्रशांत किशोर यांचे सादरीकरण

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.