AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Purnesh Modi : राहुल गांधी यांची खासदारकी कुणामुळे गेली? कोण आहेत पूर्णेश मोदी?; भाजपशी कनेक्शन काय?

नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानाला पूर्णेश मोदी यांनी तीव्र आक्षेप घेतला होता.

Who is Purnesh Modi : राहुल गांधी यांची खासदारकी कुणामुळे गेली? कोण आहेत पूर्णेश मोदी?; भाजपशी कनेक्शन काय?
purnesh modiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 24, 2023 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. मोदी समुदायाचा अपमान केल्याच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले होते. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यामुळे राहुल गांधी यांना शिक्षा तर झालीच पण खासदारकीही गमवावी लागली आहे. ज्यांच्यामुळे राहुल गांधींना संसदेतूनच बाद व्हावं लागलं ते पूर्णेश मोदी कोण आहेत? याचा घेतलेला हा आढावा.

पूर्णेश मोदी हे गुजरातमधील आमदार आहेत. ते भाजपचे सदस्य आहेत. ते गुजरातचे आहेत. ते गुजरातचे माजी मंत्रीही आहेत. पूर्णेश मोदी हे 54 वर्षाचे आहेत. त्यांचं पूर्ण नाव पूर्णेश कुमार ईश्वरलाल मोदी असं आहे. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1965 रोजी झाला होता. ते बीकॉम आहेत. त्यांच्याकडे साऊथ गुजरातमधील सूरत येथील सर चौवासी लॉ कॉलेजची एलएलबीची डिग्री आहे. त्यांनी 1992मध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतील होती.

एक कोटीची संपत्ती

2017च्या निवडणुकीत त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांचा पेशा दाखवला होता. त्यांची पत्नी गृहिणी असून उद्योगही सांभाळते. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एक कोटीहून अधिक संपत्ती आहे. त्यात सुमारे 13 लाख रुपयांच्या सोने आणि चांदीचा समावेश आहे. सध्या ते 167-सूरत (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. गुजरात सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषविलेलं आहे. परिवहन, नगरविकास, पर्यटन आणि तीर्थ यात्रा विकास विभागाची जबाबदारी सांभाळलेली आहे.

काय हे प्रकरण

राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकाच्या कोलारमध्ये प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारं विधान केलं होतं. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या विधानाला पूर्णेश मोदी यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. या प्रकरणी त्यांनी कोर्टात धाव घेऊन राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी तब्बल चार वर्ष सुनावणी सुरू होती. शुक्रवारी ही सुनावणी संपली. त्यानंतर निर्णय राखून ठेवला गेला. काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आज संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.