AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकाल लागणार अन् दादा भाजपसोबत येणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याकडे फक्त सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही नजरा आहेत. पण अंजली दमानियांच्या एका ट्विटनं खळबळ उडाली. शिंदेंचे आमदार अपात्र होणार आणि अजित पवार भाजपसोबत जाणार, असा दावाच दमानियांनी केलाय.

निकाल लागणार अन् दादा भाजपसोबत येणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
| Updated on: Apr 12, 2023 | 11:11 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार अपात्र होणार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. दमानियांनी आधी एक ट्विट केलं आणि चर्चेला फोडणी दिली. आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गंमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत, आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची तेही लवकरच बघू.

दुसरीकडे स्वत: अजित पवारांनी, मात्र अंजली दमानियांचा दावा फेटाळलाय. दमानिया चुकीचं बोलतायत, असं अजित पवार म्हणालेत. आता हा दावा करण्यामागे अंजली दमानियांनी, ईडीच्या आरोपपत्राचाही दाखला दिलाय. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवारांची नावं नाहीत. अर्थात पुरवणी आरोपपत्र दाखल करुनही अजित पवारांचं नाव येऊ शकतं आणि हे अजित पवारांवर दबाव टाकण्यासाठी भाजप ठरवून करत असल्याचा आरोप दमानियांचा आहे. तर आपल्याला कोणतीही क्लीनचिट मिळालेली नाही, चौकशी सुरु आहे असं अजित पवारांनी सांगितलं.

सत्तासंघर्षाचा निकाल कधीही येऊ शकतो. शिंदेसह 16 आमदार अपात्र झाले तर सरकारच कोसळेल आणि त्यामुळं अजित पवार हा भाजपचा प्लॅन बी असल्याचं अंजली दमानिया सांगतायत. 2019च्या निकालानंतर अजित पवारांसोबत भाजपचा प्रयोग झालाय.

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन फिस्कटल्यानंतर, ठाकरेंनी भाजपची साथ सोडली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा 3 पक्षांची महाविकास आघाडीसाठी बोलणी सुरु होती. मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असल्याचंही जाहीर केलं. पण त्याचवेळी अजित पवारांनी गट नेता म्हणून भाजपला पाठींबा देत असल्याचं पत्र राज्यपालांना दिलं आणि पहाटेचा शपथविधी घेत फडणवीसांनी मुख्यमंत्री तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मात्र 72 तासांतच अजित पवार माघारी फिरले. त्यामुळं फडणवीसांचं सरकार कोसळलं आणि आता पुन्हा, शिंदेंचे आमदार अपात्र झाल्यावर, अजित पवार फडणवीसांच्या मदतीला धावतील असं दमानियांना वाटतंय. विशेष म्हणजे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातलं ट्विट करण्याआधी म्हणजे 8 एप्रिललाही त्यांनी मी पुन्हा येईन अशी टॅगलाईन देत ट्विट केलंय. त्या ट्विट सोबत फडणवीस-अजित पवारांचा शपथविधीचा फोटोही पोस्ट केलाय.

आता प्रश्न आहे की, भाजपला काय वाटतंय? जर तरला काहीही अर्थ नाही. निकालाआधीच बोलणं हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे, असं बावनकुळे म्हणालेत. राजकारणात कोणत्याही शक्यतेला 100 टक्के वाव असतो. कारण राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे दमानियांच्या भविष्यवाणीचा निकालही जवळच आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.