AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bacchu Kadu : मंत्रिपदावर दावा आजच सोडणार होतो… मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केला; बच्चू कडू म्हणाले, आता पुढचा निर्णय…

त्यानंतर विरोधकांकडून आम्हाला अमिषं आली, आम्हीही मंत्रिपदं देऊ, आमच्यासोबत या असं विरोधक म्हणाले. पण आम्ही पाठिंब्यावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिले.

Bacchu Kadu : मंत्रिपदावर दावा आजच सोडणार होतो... मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केला; बच्चू कडू म्हणाले, आता पुढचा निर्णय...
bacchu kaduImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2023 | 12:07 PM
Share

अमरावती, दिनांक 13 जुलै 2023 : मी मंत्रिपदावर आजच दावा सोडणार होतो. पत्रकार परिषद घेऊन तसं जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. पण गेल्या अर्धा तासात मुख्यमंत्र्यांचे अनेक फोन आले. त्यांनी मला दावा न सोडण्याची विनंती केली. मला भेट. आपण चर्चा करू. त्यानंतर तू निर्णय घे, असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी फार आग्रह केल्यामुळे मी आज मंत्रिपद सोडण्याचा दावा मागे घेत आहे, असं सांगतानाच मी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदही घेणार नाही, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्रिपदाचा दावा सोडणार असा निर्णय घेणार होतो. पण मुख्यमंत्री सातत्याने फोन करत होते. अर्ध्या तासापासून त्यांचे फोन सुरू होते. आज मंत्रिपदाचा दावा सोडू नको. फक्त मला भेटून निर्णय घे. त्यांनी मला 17 ला भेटायला सांगितलं आहे. मला भेट आणि हवं तर 18 तारखेला निर्णय घे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे मी त्यांना 17 तारखेला त्यांना भेटणार आहे. चर्चा झाल्यावर मग 18 ला निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

मुख्यमंत्री पेचात

इतनी शक्ती हमे देना दाता हे गाणं मी रात्री ऐकत होतो. त्यामुळे माझं मत परिवर्तन झालं आहे. आपण सामान्यांसाठी राहिलं पाहिजे. काही चुका आमच्या हातून झाल्या असेल तर त्या दुरुस्त केल्या पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. मला दिव्यांगासाठी वेळ द्यायचा आहे. मंत्रिपद घेतल्यावर मला काम करता येणार नाही. पद माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मला पदाची लालसा नाही. मुख्यमंत्री पेचात आहेत. कुणाकुणाला पद देणार? त्यामुळे मी मंत्रिपदावरचा दावा सोडला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राजकारणाचा कंटाळा आलाय

एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता हे बदलतं राजकारण आहे. त्याचा कंटाळा आलाय. लोक विचित्रपणे प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हे थांबलं पाहिजे. सर्व काही पदासाठी नसते. लोक म्हणतात, आता तुम्हाला पद मिळणार नाही. 50 खोके घेतले, असं म्हणतात. काही प्रामाणिकपणे प्रतिक्रिया देतात तर काही पैसे घेऊन कमेंट करत आहे, असंही ते म्हणाले.

आपलं सरकार बनतंय, आम्हाला पाठिंबा द्या

एकनाथ शिंदे हे मला महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेले होते. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा द्या म्हणून सांगितलं होतं. आपलं सरकार बनतंय, आम्हाला पाठिंबा द्या, असं उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन करून म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो. शिंदे सोबत होते. आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर विरोधकांकडून आम्हाला अमिषं आली, आम्हीही मंत्रिपदं देऊ, आमच्यासोबत या असं विरोधक म्हणाले. पण आम्ही पाठिंब्यावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे शब्दावर ठाम राहिले. त्यांनी राज्यमंत्रिपद दिलं.

शिंदेंचा गुलाम बनेल

दिव्यांग मंत्रिपद तयार करावी अशी मागणी मी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. पण ते खातं तयार झालं नाही. ते झालं असतं तर गुवाहाटिला जायची वेळ आली नसती. शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी दिव्यांग मंत्रीपद तयार केलं. माझ्या बंडामुळे आणि आंदोलानामुळे हे खातं तयार झालं. मी शिंदेंचा जन्मभर आभारी राहील. त्यांचा व्यक्तिगत गुलामही बनेल. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहे, असंही ते म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.