AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यामुळे कुणाचा कंबरेचा तर कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

राज्यातील महायुतीचे सरकार हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे शिवसेना आणि मुस्लिम समाजात भिंत उभी करण्याचे काम केले आहे. पण आपल्याला ही भिंत तोडायची आहे.

माझ्यामुळे कुणाचा कंबरेचा तर कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2023 | 10:56 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडायचे नाही. कोरोना काळ असल्याने मातोश्रीतूनच त्यांचे कामकाज चालायचे. त्यानंतर त्यांना मानेचा त्रास उद्भवला. ते आजारी पडले. त्यांच्यावर सर्जरीही झाली. मानेच्या त्रासामुळे ते घराबाहेर पडत नव्हते. मानेला पट्टा लावून असायचे. उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास होत असल्याने नागपूरचे हिवाळी अधिवेशन मुंबईत झालं. उद्धव ठाकरे यांच्या या आजारपणावरून विरोधकांनी त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. आता त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची खिल्ली उडवली आहे.

शिंदे गटाने काल मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अल्पसंख्याक समाज आला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. जे विषय सोडवायचे ते पटकन सोडवणार आहे. जे धोरणात्मक निर्णय आहेत. तेही अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवणार आहे. बघत आहे, करत आहे. पाहात आहे हे मी करत नाही. होणारं असेल तर करून टाकतो. आधीचं सरकारही तुम्ही पाहिले. सर्व घरात बसले होते. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना बाहेर काढलं आहे. सर्वजण फिरत आहेत. जागोजागी जात आहेत. कुणाचा कंबरेचा पट्टा निघाला, कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला. सर्व निघालं. चांगलंय. चांगलंय. सर्व चांगलं आहे, अशी टीकाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

देशाभिमान बाळगणारा मुस्लिम देशभक्त

शिवसेनेने मंदिराबरोबरच मशिदीही वाचविल्या आहेत. साबिर शेख आमचे मंत्री होते. भारतात राहणारा मुस्लिम आपलाच आहे. देशभक्त आहे. पण भारतात राहून पाकिस्तानची वाहवा करणारा मुसलमान देशभक्त नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. ते खरं ही आहे. आपल्या देशाचा अभिमान बाळगणारा मुस्लिम बांधव हा खरा देशभक्त आहे. हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती आणि त्याच विचारातून आम्ही काम करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आली. काही मुस्लिम बांधवांनी आषाढी म्हणून दुसऱ्या दिवशी बकरे कापले. ही चांगली गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.

काँग्रेसपासून सावध राहा

तुमचं आणि माझं रक्त सारखच आहे. जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा ते हिंदूला जाईल की मुस्लिमांना जाईल हे आपण पाहत नाही. पण काँग्रेस आपल्यात फूट पाडत आहे. मुस्लिम समाज केवळ कुणावर तरी अवलंबून राहावा हेच काँग्रेसचं धोरण राहिलं आहे. त्यामुळे त्यापासून सावध राहा, असं आवाहनही त्यांनी केलं.

अर्थव्यवस्था वाढलीय

देशाबाबत सर्वांना अभिमान आहे. आपला देश महान देश आहे. आपल्या देशाची वेगळी ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जात पात धर्म पाहत नाही. त्यांनी आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे. मोठमोठ्या देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. पण मोदींनी आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवली. तसेच आपली अर्थव्यवस्था वाढवली आहे, असंही ते म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.