Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांशी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

आज मन हलकं झालं, नाही तर मी गेलोच होतो; एकनाथ खडसे भावूक
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 8:07 PM

मुंबई: राष्ट्रवादीत प्रवेश केला… चार वर्षानंतर आज मन हलकं झालं… डोक्यावरचं ओझं गेलं… पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं… नाही तर मी गेलोच होतो… अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी महसूल मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे भावूक झाले होते. (Eknath Khadse expressed his sentiments when joining ncp)

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थकांशी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. चार वर्षानंतर आज मन हलकं झालं. डोक्यावरचं ओझं गेलं. जयंतराव, (जयंत पाटलांना उद्देशून) ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असं सांगताना खडसे भावूक झाले होते. पवार साहेब मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला. नाही तर मी गेलोच होतो. राजकीय जीवनातून उठलो असतो. भाजपने मला काहीच दिलं नसतं. त्यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेत ठेवलं असतं. तुम्ही ज्येष्ठ झालात आता मार्गदर्शन करा, असं सांगितलं असतं. ज्यांना पक्षात येऊन चार दिवस झाले नाहीत, त्यांनी मला हे सांगितलं असतं, असंही ते म्हणाले.

कुणाच्याही पाठित खंजीर खुपसला नाही

मला काही पद हवं म्हणून मी राष्ट्रवादीत आलो नाही. मला पदाचा हव्यास नाही. तर माझा भाजपमध्ये छळ झाला. मला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच मी आज राष्ट्रवादीत आलो आहे, असं ते म्हणाले. मी संघर्ष केला पण कुणाच्या पाठित खंजीर खुपसला नाही. ज्येष्ठ नेते म्हणायचे आणि पाठित खंजीर खुपसायचा असं राजकारण कधी केलं नाही. बाई किंवा महिलेला समोर ठेवून तर कधीच राजकारण केलं नाही. तो माझा स्वभाव नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. (Eknath Khadse expressed his sentiments when joining ncp)

राष्ट्रवादी वाढवणार

भाजप वाढवण्यासाठी खस्ता खालल्या. पण शेवटी हाती बदनामी आली. जेवढं काम भाजपसाठी निष्ठेनं केलं. तेवढंच काम राष्ट्रवादीसाठी करेल. जशी भाजप वाढवली तसाच राष्ट्रवादीचा विस्तार करेल. आणि मी ते करून दाखवेन. अरुण गुजराथींनाही ते माहीत आहे. फक्त मला तुमची साथ हवी. पाठिशी कोणी उभे असेल तर मी कुणाला घाबरत नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

कुल्फी, चॉकलेट मिळावं म्हणून चंद्रकांतदादा भाजपमध्ये आले; खडसेंचं प्रत्युत्तर

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच चंद्रकांतदादांची टीका; खडसे-पाटील जुंपली

BLOG – राष्ट्रवादीत खडसेंचाही ‘राणे’ तर होणार नाही ना?

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.