AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला, 4-4-2 फॉर्म्युला ठरला, अजितदादा यांच्या प्रयत्नांना यश; विस्तार आजच?

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आज किंवा उद्या या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. भाजप नेते अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला, 4-4-2 फॉर्म्युला ठरला, अजितदादा यांच्या प्रयत्नांना यश; विस्तार आजच?
amit shahImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2023 | 7:19 AM
Share

मुंबई : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा घोळ अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही प्रश्न निकाली लावण्यात आले आहेत. या बैठकीत मंत्रिपदाचा 4-4-2 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गैरहजेरीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी हा तिढा सोडवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सलग तीन दिवस तीन रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाती वाटपाची चर्चा सुरू होती. पण त्यातून काहीच मार्ग निघत नव्हता. एक तर शिंदे गटाचा अजित पवार यांना अर्थमंत्रीपद देण्यास विरोध होता. तसेच सहकार आणि ग्रामविकास खात्यावरूनही माथापच्ची सुरू होती. हा तिढा सुटता सुटत नव्हता. त्यामुळे अखेर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल संध्याकाळी दिल्ली गाठली.

अन् फॉर्म्युला ठरला

दिल्लीत आल्यावर अजित पवार आणि पटेल यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत सर्व खात्यांवर चर्चा झाली. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली. यावेळी नव्या विस्तारासाठी 4-4-2 हा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानंतर या तिन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभांबाबतही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. तसेच येणारा काळ युतीसाठी किती अनुकूल असेल याची माहितीही शाह यांनी या दोन्ही नेत्यांकडून घेतल्याचं सांगितलं जातं.

काय आहे 4-4-2 फॉर्म्युला?

4-4-2 फार्म्युल्यानुसार भाजपला चार मंत्रिपद मिळणार आहेत. त्यानंतर शिंदे गटालाही चार मंत्रिपद मिळणार असून राष्ट्रवादीला दोन मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे एकूण 10 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नव्या फॉर्म्युलानुसार भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी चार मंत्रिपद मिळणार आहेत. या दोन्ही गटाचे आधीच मंत्रिमंडळात प्रत्येकी 10 मंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांची संख्या प्रत्येकी 14 होणार आहे. राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळात 9 मंत्री आहेत. त्यांना आणखी दोन मंत्रीपदे मिळणार असल्याने त्यांच्या मंत्र्यांची संख्या 11 होणार आहे.

आजच शपथविधी

दरम्यान, दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याने आज किंवा उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. स्वत: प्रफुल्ल पटेल यांनी ही माहिती दिली. काही आमदार गावाला आहेत. ते जर संध्याकाळपर्यंत मुंबईत येऊ शकले तर मंत्रिमंडळाचा विस्तार आजच होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.

खाते वाटपही आज किंवा उद्या

राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांना आधीच मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे. पण त्यांना खाती देण्यात आलेली नाही. या खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. त्यांना आजच खाती दिली जाण्याची शक्यता आहे. किंवा नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर नव्या मंत्र्यांसह सर्वांची खाते वाटप केले जाऊ शकते, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.