AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही, राज्यावर राजकीय संकट येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा

राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही, राज्यावर राजकीय संकट येणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा
| Updated on: Dec 03, 2020 | 6:40 PM
Share

मुंबई: राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी हा दावा केला. आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चाललं आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही. त्यामुळे राज्यावर राजकीय संकट येणार नाही. राजकीय संकट आणणार असाल तर तसं होणारही नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

तीन चाकांचं सरकार अशी आमच्यावर टीका करण्यात आली. पण हे सरकार केवळ तीन चाकांचं नाही. या सरकारला चौथं चाकही आहे. हे चौथं चाक जनतेच्या विश्वासाचं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. जनता जनार्दनाचा रथ आहे. तो पुढेच धावेल, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र कधी थांबला नाही, थांबणार नाही. महाराष्ट्र कधीही कुणाला घाबरला नाही आणि घाबरणारही नाही. माझं एक एक पाऊल मी दमदारपणे टाकणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आमचं सरकार आल्यानंतर राज्यात संकटाची मालिका सुरू झाली. नैसर्गिक संकटातही काही लोकांनी राजकारण केलं. हे दुर्देवी आहे, अशी भाजपवर टीका करतानाच कोरोनाच्या काळात आम्ही कधी कोरोनाच्या आकड्यांची लपवाछपवी केली नाही. या संकटावरही आपण लवकरच मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अजितदादांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने तारीफ केली. उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षभरात आपल्या कामाचा ठसा उमटवून दाखवला. नागरिक आणि प्रशासनात संघभावना निर्माण केली. तर दुसरीकडे त्यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. हे सगळे करत असताना त्यांनी पुढाकार घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ही मोहीमही राबवली. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याचअंशी नियंत्रणात राहण्यास मदत झाली, असे अजित पवार यांनी सांगितले.

या दोघांनी कोरोनाची औषधे, इंजेक्शन्स याचा इतका अभ्यास केलाय की दोघेही अर्धे डॉक्टर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे, याचा सतत अभ्यास दोन्ही नेत्यांकडून सुरु होता. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कोरोना झाला तरी त्यांच्यापाशी मात्र कोरोना फिरकलाच नाही, असंही ते म्हणाले. (Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा एवढा अभ्यास केला की ते अर्धे डॉक्टरच झालेत, कोरोना त्यांच्यापाशी फिरकलाही नाही: अजित पवार

धुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा

‘BHR घोटाळ्यात गिरीश महाजनांशी संबंधित कंपनीचा सहभाग; पैसे खाताना कचराही सोडला नाही’ : अनिल गोटे

(Maharashtra government strong, stable says cm uddhav thackeray)

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.