सर्वात मोठी बातमी ! महायुती विधानसभेच्या किती जागा जिंकणार?; देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला

कॉम्प्रमाईजची भूमिका घेतली तर युती टिकते. आपण आपलंच पाहिलं तर दुसऱ्याचा विश्वासघात होईल. आपण स्वतःबाबत विचात केला, तर शेखचिल्ली प्रमाणे ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल, असा इशाराच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सर्वात मोठी बातमी ! महायुती विधानसभेच्या किती जागा जिंकणार?; देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 9:13 PM

लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानावरून आणि येत्या विधानसभा निवडणुकीत कुणाच्या किती जागा निवडून येतील यावर दावे केले जात आहेत. महाविकास आघाडीने तर आमच्या 154 जागा निवडून येतील असा दावा केला आहे. मात्र, महायुतीने विधानसभा निवडणुकीत कोणताही दावा केला नव्हता. आज मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आकडाच जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या 200 जागा निवडून येऊ शकतात, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुंबईत आज महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधितक करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचं गणितच समजून सांगितलं. नुकतीच लोकसभा पार पडली. राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. लोकसभेत मविआ म्हणते आमचा विजय झाला. मविआ 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. आपण निर्धार केला आणि किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आपण गाफील राहिलो

लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटं बोलत होते. मात्र आपणही गाफील राहिलो, अशी कबुली देतानाच फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खोटं बोलायची चटक लागली

सत्य चिरकाल जिवंत राहतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल. दुसरी नाही. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागलीय. विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही माहीत नाही, असा टोला लगावतानाच आपण सकारात्मकतेने योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही. आपण योजनांची माहिती देतो अन् ते सकाळी येऊन काही तरी वेडंवाकडं बोलतील, माध्यमं तेच दाखवतील, आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

बेगडी भावांपासून सावध राहा

लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेलं. लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

खुमखुमी असेल तर…

सर्वपक्षीयांना सांगतो की, आपल्यात एकमेकांमध्ये विसंवाद आहे. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. खुमखुमी असेल तर नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा, अशा शब्दात महायुतीच्या वाचाळवीर प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं.

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.