AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक

लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
| Updated on: Apr 12, 2021 | 2:45 PM
Share

मुंबई: लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. लॉकडाऊन करताना पंतप्रधान नरेंद मोदींनी कुणाला विचारात घेतलं नव्हतं आणि पॅकेजही जाहीर केलं नव्हतं, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही टीका केली. देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

पैसे द्या, पैसे टाका सांगणं योग्य नाही

महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु, जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका सांगत आहेत ते योग्य नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सेमी लॉकडाऊनची स्थिती

राज्यात सेमी लॉकडाऊनची स्थिती आहे. आज दिवसाला 63 हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बेड्स, ऑक्सिजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील जो काही निर्णय असेल तो परिस्थितीचा आढाव घेऊनच घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांनी गुजरातकडे पाहावं

कोरोना काळात संपूर्ण देशात जसे लोकांना पैसे देण्यात आले, तसे महाराष्ट्रातही देण्यात आले. मजुरांना 4 महिने दोनवेळेचं जेवण देण्यात आलं आहे, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आरोप करत आहेत. पण गुजरातमध्ये काय स्थिती आहे. ते त्यांनी बघावं. महाराष्ट्राने चांगलं काम केलं आहे. उत्तर प्रदेशात तर टेस्टच केल्या जात नाही, असंही त्यांनी सांगितलं. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

संबंधित बातम्या:

सरकार पाडतील तेव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; राऊतांचा खोचक टोला

Pandharpur By-Election : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पंढरपुरात देवेंद्र फडणवीसांचा पहिला थेट इशारा

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं, पहिल्यांदाच बालाजीच्या मृत्यूचं कारण उघड

(nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.