AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका’, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य

"मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये आणि आपल्या मुंबईचा मान-सन्मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवण्यासाठी काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं", असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

'मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका', अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य
| Updated on: May 01, 2023 | 8:40 PM
Share

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कामांचा उल्लेख केला.  “संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये आणि आपल्या मुंबईचा मान-सन्मान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वाढवण्यासाठी काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मुंबई टिकली, मुंबई, मराठी माणसाचा अभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला, मराठी माणूस एकजूट करून राहिला हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“काही लोकांना फोडण्याचा राजकारण झालं. अशा पद्धतीचा राजकारण करून उद्याच्या काळामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे योग्य पद्धतीने राहणार आहे का? कायदा काय राहणार? याचाही विचार तुम्ही मी सगळ्यांनी केला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

“आपल्या इथं हे सरकार आल्यापासून सांगितलं, कोणत्याही निवडणुकांमध्ये, विधान परिषदेची असेल विधानसभेचे असतील पोट निवडणूक असेल, आता काल झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका असतील बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारचे यश मिळवलं आहे. जनता आपल्याबरोबर आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला नाकारता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“माझी आपल्याला विनंती आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सोनिया गांधींनी, शरद पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं होतं, अडचणी अधिक होत्या. तरुणाचं संकट होतं. परंतु त्याच्यावर मात करून आम्ही सगळ्यांनी हे महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम केलं”, असा दावा अजित पवार यांनी केला. \

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?

महाराष्ट्रामध्ये आज अवकाळी पाऊस पडतोय. त्याचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी केला. माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे. त्याच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या फळबागा, त्याची उन्हाळी पिक उध्वस्त झालेली आहेत. परंतु त्यांना मदत करण्याची भूमिका हे आताच्या राज्यकर्त्यांची नाही. काय करतात त्यांचं काम नाही का?

हे सरकार काही बोलायला तयार नाहीये आणि म्हणून मित्रांनो एवढ्यावरच नाही तर अजूनही एक ते पाच तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे तरी मुंबईतली सभा असली तरी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला बळीराजा तुमच्या माझी सगळ्यांची सेवा करतोय. त्याला आधार देण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार आहे.

सरकारला दहा महिने झाले. सरकार निवडणुकांना का घाबरतं? महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घेत नाहीत. तुम्ही निवडणुका जाहीर का करत नाहीये? आता तर पावसाळा पण नाहीये. परंतु निव्वळ यांच्या मनामध्ये भीती आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता काय करेल याच्याबद्दलचा विश्वास शिंदे-फडणवीस सरकारला नाहीये. आज मुंबईसारखं एक महत्त्वाचे शहर काही राज्यांच्या पेक्षा या शहराचं बजेट जास्त आहे, असं असताना देखील तिचा कारभार राज्याच्या प्रमुखांच्या अंडर चाललेला आहे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.