AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार; जयंत पाटलांचं मोठं विधान

पत्राचळ प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुबंईचा पालकमंत्री होतो मलाही पत्राचाळीतील लोक भेटायला आले होते. भाजपला नैराश्य आले आहे, त्यामुळेच आरोप आणि टीका सुरू आहे, असं ते म्हणाले.

राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार; जयंत पाटलांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2022 | 6:29 PM
Share

चंदन पूजाधिकारी, नाशिक: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर (bjp) जोरदार निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालय 40 आमदारांना कधीही बरखास्त करू शकतात. सर्व 40 आमदारांना मंत्री व्हायचे आहे. हे 40 जण किती त्रास देत असतील. पण माझी सहानुभूती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासोबत आहे, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. भाजपच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आल्याने भाजपचे 106 आमदारही नाराज आहेत. सरकार अस्थिर असल्याचं प्रशासनालाही समजून चुकलं आहे. त्यामुळे अधिकारीही ऐकत नाहीत. काही आमदार तर खासगीत कुठून अवदसा आठवली अन् यांच्या नादाला लागलो असं सांगतात, असा दावाही त्यांनी केला.

जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेनेवर बोलण्यासारखे काही नसल्यानं शरद पवार आणि राष्ट्रवादीला दोष देत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्याच कारण नाही. दुसरा गट बीकेसीला गेला. त्यामुळे शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्याची गरजच नव्हती. पोलीस आणि मनपाकडे सबळ कारण नाही. त्यांनी परवानगी दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

पत्राचळ प्रकरणी शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुबंईचा पालकमंत्री होतो मलाही पत्राचाळीतील लोक भेटायला आले होते. भाजपला नैराश्य आले आहे, त्यामुळेच आरोप आणि टीका सुरू आहे, असं ते म्हणाले.

फडणवीस यांना संपविण्याचा प्रयत्न कधी केला नाही. अशी कुठली कृती केली असेल ती आम्हाला संगावी. आम्ही त्यांचा सन्मान केला. त्यांना असे का वाटते माहीत नाही. निवांत भेटले को विचारेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.