AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेईमानी करून आलेल्या ‘त्या’ सरकारला एक वर्ष पूर्ण; नवाब मलिकांची भाजपवर खोचक टीका

भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बेईमानी करून आलेलं सरकार, अशी संभावना केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. (ncp leader nawab malik slams bjp)

बेईमानी करून आलेल्या 'त्या' सरकारला एक वर्ष पूर्ण; नवाब मलिकांची भाजपवर खोचक टीका
| Updated on: Nov 23, 2020 | 4:23 PM
Share

मुंबई: भाजप नेत्यांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बेईमानी करून आलेलं सरकार, अशी संभावना केली जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. भाजपने गेल्यावर्षी बेईमानी करून आणलेल्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (ncp leader nawab malik slams bjp)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना नवाब मलिक यांनी ही टीका केली. गेल्यावर्षी बेईमानीने तयार झालेले काही दिवसाचे सरकार राज्यात आले होते. त्याला एक वर्ष झालं आहे. भाजपने ही बेमाईनी केली होती, असं सांगतानाच आता काहीही केलं तरी सरकारला अडचण येणार नाही, असं मलिक यांनी सांगितलं.

वीजबिल माफीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपने वीजबिल थकबाकी वसूल केली नाही. त्याचा परिणाम आज पाह्यला मिळत आहे. ग्राहकांना दिलासा द्यावा ही सरकारची इच्छा आहे. पण भाजपने एमएसईबीची अवस्था अत्यंत वाईट करून ठेवली आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

यावेळी कोरोनावरही त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या काळात जेवढी व्यवस्था राज्यात झाली. तेवढी व्यवस्था देशात कुठेच झाली नाही. महाराष्ट्र सरकारने कोरोना परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

हवेवर राजकारण चालत नाही

मलिक यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. कुणाचा झेंडा काय आहे. त्याचा रंग काय आहे. त्यावर राजकारण चालत नाही. मुंबईत भाजपची ताकद नाही. मागच्यावेळी त्यांची हवा होती. त्या हवेत त्यांचे नगरसेवक निवडून आले. कोणतंही राजकारण दीर्घकाळ ‘हवे’वर चालत नाही. मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता येईल, असं मला वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (ncp leader nawab malik slams bjp)

आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी

कोरोनाच्या आधी फेब्रुवारीत चुनाभट्टीमध्ये आमचं शिबीर झालं होतं. या शिबिराला आठ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही पालिका निवडणुकीच्या कामाला सुरुवातही केली होती. पण कोरोनामुळे ते थांबलं. पण आता आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. त्यासाठी संघटन बांधणी सुरू आहे. प्रत्येक वॉर्डात आमची बांधणी सुरू आहे, असं ते म्हणाले. सत्तेत असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे. पण आज त्यावर भाष्य करता येणार नाही. निवडणुकीला वेळ आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘वर्षपूर्ती जबाबदारीची, नांदी शाश्वत विकासाची’, महापौर मोहोळांचं एका वर्षाचं रिपोर्टकार्ड

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस

(ncp leader nawab malik slams bjp)

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.