AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता तुम्ही हिमालयात जाणार का?’ पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन

पदवीधर निवडणुकांमध्ये जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं होतं.

'आता तुम्ही हिमालयात जाणार का?' पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन
| Edited By: | Updated on: Dec 06, 2020 | 2:59 PM
Share

पुणे : राज्यात झालेल्या पदवीधर निवडणुकांमध्ये भाजपला मोठा पराभव पाहावा लागला. तर तीन तिघाडी काम बिघाडी अशी टीका होणारं सरकार जिंकून आल्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही मोठा जल्लोष केला. पदवीधर निवडणुकांचा निकाल समोर येताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एका व्यक्तव्यावरून चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. याबद्दल थेट चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनाच विचारलं असता त्यांनी मौन बाळगला. (now Will you go to the Himalayas Chandrakant Patils silence on journalist question)

खरंतर, पदवीधर निवडणुकांमध्ये जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं होतं. भाजपच्या पराभवानंतर आता चंद्रकांत पाटील खरंच हिमालयात जातील अशी टीका ठाकरे सरकारच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. यावर आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भाजपचा पराभव झाला आता तुम्ही हिमालयात जाणार का? असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगलं. त्यांच्या या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यांच्या याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांनी त्यांना टार्गेट केलं होतं. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, अशी खोचक टिप्पणी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली होती.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढली. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं मत चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं होतं. ते पुण्यात वर्षपूर्ती कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

त्यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.” (now Will you go to the Himalayas Chandrakant Patils silence on journalist question)

इतर बातम्या – 

Special Report | हिमालयात जाण्याच्या वक्तव्यावरुन आघाडीच्या नेत्यांची चंद्रकांत पाटलांवर टालेबाजी

चंद्रकांत पाटील शब्दाचे पक्के आहेत, त्यांनी खरंच हिमालयात जायला पाहिजे: अब्दुल सत्तार

(now Will you go to the Himalayas Chandrakant Patils silence on journalist question)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.