AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sada Sarvankar : शिवसेनेतून काढण्याआधीच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, सदा सरवणकरांनी दिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा

Sada Sarvankar : शिवसेनेने आजही काही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Sada Sarvankar : शिवसेनेतून काढण्याआधीच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, सदा सरवणकरांनी दिला विभागप्रमुखपदाचा राजीनामा
आ. सदा सरवणकरImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 12, 2022 | 12:18 PM
Share

मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत (shivsena) एकच खळबळ उडाली आहे. शिंदे समर्थक शिवसेना पदाधिकारी शक्तीप्रदर्शनही सुरू केलं आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईपासून ठाण्यापर्यंत ते थेट यवतमाळ पर्यंतच्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेने कारवाई सुरू केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या आरोपावरून या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी त्यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच स्वत: हून शिवसेनेच्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. एवढेत नव्हे तर त्यांच्यासोबतच्या नऊ पदाधिकाऱ्यांनीही पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. तसेच शिवसेनेचे विभागप्रमुख आहेत. दादर, प्रभादेवी, माटुंगा आणि माहीम परिसरात सरवणकर यांचं वर्चस्व आहे. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जात आहे. मात्र, सरवणकर यांनी बंड करून एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. त्यानंतर शिंदे गटाचं राज्यात सरकार आलं. त्यामुळे शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू केली होती. रोज दोन चार पदाधिकाऱ्यांची शिवसेनेकडून हकालपट्टी सुरू असतानाच सदा सरवणकर यांनी विभागप्रमुख पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे.

शाखाप्रमुखांचाही राजीनामा

सदा सरवणकर यांच्यासोबत तीन शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, उफविभाग समन्वयक, दोन महिला शाखा संघटक आणि एका महिला उपविभाग समन्वयकाने पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हे राजीनामे पाठवण्यात आले आहेत.

यांचे राजीनामे

सदा सरवणकर – विभागप्रमुख मिलिंद तांडेल – शाखाप्रमुख संदीप देवळेकर – शाखाप्रमुख संतोष तेलवणे – शाखाप्रमुख अजय कुसूम – शाखा समन्वयक कुणाल वाडेकर – उपविभाग समन्वयक अरुंधती चारी – महिला शाखासंघटक मंदा भाटकर – शाखा संघटक शर्मिला नाईक – महिला उपविभाग समन्वयक

तांडे आणि वैद्य वाद

दरम्यान, आज माहिमध्ये सदा सरवणकर समर्थक मिलिंद तांडेल आणि शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांच्यात वाद झाला. पोस्टर लावण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. मात्र, नंतर हा वाद मिटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

समझौता घडवून आणणाऱ्याची हकालपट्टी

शिवसेनेने आजही काही जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर सुरतला गेले होते. त्यांच्यासोबत रवींद्र फाटकही होते. आज फाटक यांचीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.