Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगावा की सांगू नये?; शरद पवारांनी टोचले एकनाथ शिंदे यांचे कान

Sharad Pawar : सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही. पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगावा की सांगू नये?; शरद पवारांनी टोचले एकनाथ शिंदे यांचे कान
शिवसेनेच्या धनुष्यबाणावर दावा सांगाव की सांगू नये?; शरद पवारांनी टोचले एकनाथ शिंदे यांचे कानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 11:10 AM

बारामती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच ओरिजीनल शिवसेना (shivsena) असल्याचा दावा केला आहे. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा केला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे यांचे कान टोचले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काय केलं होतं, याचं उदाहरणही दिलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे (eknath shinde)  यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला. वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्हं आम्ही मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वढवणे योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी बारामतीत मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सल्ला दिला.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील, राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी श्रीलंकेतील परिस्थितीवर भाष्य केलं. श्रीलंकेत एकाच कुटुंबाची सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अर्थमंत्री हे एकाच कुटुंबातील होते. श्रीलंकेत सत्तेचे केंद्रीकरण झालं. त्यामुळे असंतोष वाढायला लागला होता. त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला. श्रीलंकेची जी परिस्थिती आहे ती एका दिवसातली किंवा काही महिन्यातली नाही. काही वर्षातली आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्धभवली आहे ती पाकिस्तानमध्ये देखील उद्भवू शकते. आपल्या आजूबाजूला हे वातावरण आहे याची नोंद आमच्या देशाच्या राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. विशेषत: मोदींनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेण्याची गरज आहे. सत्ता केंद्रीत जिथे झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतात राष्ट्रीय पातळीवर सत्ता केंद्रीत होते की काय याची शंका लोकांमध्ये निर्माण होते आहे. सध्या आपल्याकडे उद्रेक होण्याची परिस्थिती दिसत नाही. पण आपण सावध राहण्याची शक्यता आहे, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

हर घर तिरंगा पक्षीय कार्यक्रम नाही

यावेळी त्यांनी हर घर तिरंगा या कार्यक्रमावर भाष्य केलं. राष्ट्रीय कमिटी आहे. त्याचा मी सदस्य आहे. त्यात हर घर तिरंगा मोहिमेची चर्चा झाली. हा पक्षीय कार्यक्रम नाही. यात आम्हा सगळयांची त्यांना साथ आहे, असं पवारांनी सांगितलं.

सरकारला आस्था नाही

संसद चालवण्याची आस्था केंद्र सरकारला आहे, असं गेल्या काही वर्षातून वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला. केंद्राकडून चर्चेचे मार्ग बंद केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

पवारांनी बोलणे टाळले

शिंदे सरकारमध्ये संजय राठोड यांचा समावेश करण्यात आला. तसेच मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आला नाही. त्याबाबत पवारांना विचारण्यात आले. त्यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले. मी त्यावर बोलणार नाही, असं ते म्हणाले.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.