AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्य टेन्शन फ्री जगायचं असेल, तर या 3 लोकांपासून दोन हात लांबच राहा

आचार्य चाणक्य हे त्यांच्या ज्ञान आणि चपळ बुद्धीसाठी ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे.

Chanakya Niti | आयुष्य टेन्शन फ्री जगायचं असेल, तर या 3 लोकांपासून दोन हात लांबच राहा
संकटसमयी तेथून घाबरून पळून जाणे हे भ्याडपणाचे लक्षण मानले जाते, पण काही विशिष्ट परिस्थितीत पळून जाणे म्हणजे भ्याडपणा दाखवत नाही, तर समजूतदारपणा म्हणतात. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतीमध्ये अशा काही परिस्थितींचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये पळून जाणे हा शहाणपणाचा निर्णय आहे.
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 11:33 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य हे त्यांच्या ज्ञान आणि चपळ बुद्धीसाठी ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये आपण आयुष्य कसे जगायला हवे याबाबत सांगितले आहे. चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सुखी आयुष्य जगण्यासाठी आपण कोणते उपाय करणे गरजेचे आहे हे सांगितले आहे.

आचार्य यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु त्यांनी कधीही परिस्थितींपुढे हार मानली नाही. त्यांचे हे अनुभव लोकांच्या कामी यावेत असे त्यांना वाटत असावे म्हणूनच त्यांनी आपण आयुष्यात कोणत्या व्यक्तींपासून लांब राहावे हे सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, व्यक्तीने नेहमी काही लोकांपासून अंतर राखले पाहिजे. या लोकांसोबत राहिल्याने आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. तुम्हाला आयुष्यात मोठ्या समस्यांना समोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या व्यक्ती

कोणापासून दूर राहावे हे जाणून घ्या

वाईट सवयी असलेल्या लोकांपासून दूर रहा

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या लोकांना वाईट सवयी आहेत अशा लोकांपासून लांब राहणे केव्हाही चांगले. त्याच्या चुकीच्या सवयी तुम्हाला लागल्या तर तुम्ही मोठ्या संकटात येऊ शकता. जर तुम्हाला आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल तर अशा लोकांपासून लांबच राहा.

लोभी लोकांपासून दूर रहा

आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात यश मिळवायचे असेल तर लोभी लोकांपासून नेहमी दूर राहिले पाहिजे. कारण लोभी माणूस कधीच कोणाचा असू शकत नाही, अशा व्यक्ती गरज असतानाच ते तुमची साथ सोडतात आणि स्वत:चा फायदा पाहतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांब राहिलेल केव्हाही चांगले,

वाईट काळात साथ न देण्याऱ्या व्यक्ती

आचार्य चाणक्य म्हणतात वाईट काळात साथ न देण्याऱ्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात स्थान देवू नये. हे व्यक्ती फक्त तुमच्या चांगल्या काळामध्ये तुमच्या सोबत असतात. असे व्यक्ती तुमचे कधीच चांगले मित्र होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या पासून लांब राहणंच चांगले.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा

Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.