AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहाण्या माणसाने कधीही करु नये आयुष्यात ‘या’ चुका, होऊ शकते मोठे नुकसान

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये जीवन सुधारण्याची सूत्रे तर दिलीच, पण माणसाला समस्यांनी घेरणाऱ्या सवयींचाही उल्लेख केला. खोटं बोलण्याची सवय माणसाला अडचणीत आणते, असं त्यांचं मत होतं. खोटे बोलल्याने समस्या तर वाढतातच, शिवाय व्यक्तीची प्रतिमाही मलीन होते.

शहाण्या माणसाने कधीही करु नये आयुष्यात 'या' चुका, होऊ शकते मोठे नुकसान
| Edited By: | Updated on: Nov 16, 2024 | 4:03 PM
Share

आचार्य चाणक्य यांना कौटिल्य म्हणूनही ओळखले जाते. आचार्य चाणक्य हे इतिहासातील महान राजकारणी, शिक्षक आणि तत्त्वज्ञांपैकी एक मानले जातात. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथही रचला, ज्यात राजकारण, युद्ध आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, जो माणसाला योग्य दिशेने चालण्यासाठी मार्गदर्शन करतो.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये जीवन सुधारण्याची सूत्रे तर दिलीच, पण माणसाला समस्यांनी घेरणाऱ्या सवयींचाही उल्लेख केला. खोटं बोलण्याची सवय माणसाला अडचणीत आणते, असं त्यांचं मत होतं. खोटे बोलल्याने समस्या तर वाढतातच, शिवाय व्यक्तीची प्रतिमाही मलीन होते. आचार्य चाणक्य यांनीही ज्ञानी व्यक्तीसाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. शहाण्या माणसाने आयुष्यात काही चुका करू नयेत, असे त्यांनी सांगितले आहे. कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.

यशासाठी कर्म आणि ज्ञान

आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्याप्रमाणे पक्षी आपल्या दोन पंखांनी उडतो, त्याचप्रमाणे मनुष्य कार्य आणि ज्ञानाच्या साहाय्याने यशाचे शिखर गाठू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म आणि ज्ञान नेहमी योग्य दिशेने ठेवले पाहिजे.

आदर आणि संसाधनांचे महत्त्व

आचार्य चाणक्य यांच्या नुसार जिथे सन्मान नाही, उपजीविकेची साधने उपलब्ध नाहीत किंवा ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही, अशी जागा ताबडतोब सोडावी. कोणत्याही बुद्धिमान व्यक्तीसाठी हे खूप महत्वाचे आहे.

सत्य बोलण्याचा आणि शहाणपणाने खर्च करण्याचा सल्ला

चाणक्य नेहमी सांगत असतात की सुखी आणि यशस्वी जीवनासाठी नेहमी सत्य बोला, खर्च शहाणपणाने करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. जे लोक असे करतात ते आनंदी तर असतातच पण त्यांना बुद्धिमान देखील म्हटले जाते.

शत्रू आणि मित्रांपासून सावध राहा

चाणक्य यांच्या मते प्रबळ शत्रू आणि कमकुवत मित्र दोन्ही दु:खाला कारणीभूत ठरतात. त्यांच्यापासून नेहमी सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.

भूक आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध

ज्ञानी माणसाने कधीही उपाशी राहू नये, कारण उपाशी राहिल्याने बुद्धी कमकुवत होते ज्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा खराब होऊ शकते. त्याचबरोबर अनेकदा भूक लागल्यावर माणूस चिडचिडा होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.